मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, लसीकरणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून, एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी, “४ दिवस लसीकरण बंद ठेवायचं आणि त्यानंतर एक दिवस लसीकरण करून रेकॉर्ड निर्माण केल्याचा दावा करायचा, हा सरकारकडून निव्वळ पोरखेळ सुरु आहे. लोकांच्या जीवाशी हा खेळ आहे. मोदींना रेकॉर्ड करायची, इव्हेंट करायची आणि प्रसिद्धीची हौस आहे,” असा हल्लबोल केला आहे.
महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ करण्यासाठी ठाकरे सरकार अवलंबणार ‘ओपनिंग अप’चा मंत्र
तसेच, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारवार बोलताना, “पंतप्रधानांनी काही मंत्र्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी केली. ७ वर्षे ती लोकं या पदावर होती. त्यानंतर आता अचानक हे मंत्री त्यांना कुचकामी होते, असं लक्षात आलं का? त्यांना इतके दिवस मंत्रिमंडळात ठेवलंच का? या सरकारने देशाचा आणि प्रशासनाचा खेळखंडोबा केला आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान दिले गेले नाही. त्यावरून सध्या भाजपमध्ये गोंधळ सुरु आहे. त्या गोंधळावर भाष्य करताना, “पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं, कुणाला नाही हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा आपण सन्मान केला पाहिजे. काहींना अपेक्षा होत्या की त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. मात्र, ही नाराजी काही जास्त दिवस टिकत नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
सूत्र : वसुलीचे पैसे घेणारे ‘नंबर वन’ कोण? वाझेने जबाबात केला मोठा खुलासा- ईडी
यावेळी, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली असून, “नाना पटोले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी आहे. ते त्यांची जबाबदरी योग्य आणि व्यवस्थित पद्धतीने पार पाडत आहेत. महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे आणि ते आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,” असं म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली आहे.
Read Also :
- नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांचे सत्य बाहेर आलं पाहिजे, अन्यथा हा पोरखेळ बंद करा – मुनगंटीवार
- “हो! पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय हे खरं आहे”
- गृहमंत्री अमित शहांचा दौरा: दहा ते दुपारी एक दरम्यान दारे खिडक्या बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
- नाशिकच्या हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून ५ लाखांच्या नोटा चोरीला
- “त्यांचेच कौरव-पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ”, काँग्रेसचा भाजपला टोला