नागपूर : नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर आता सुनील केदारांचा प्रभाव कमी करण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. सुनील केदारांचा नागपुर शहासह ग्रामिण भागात चांगलचं वचर्स्व आहे. पुढील निवडणुका लढणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहेतच. परंतु आता केदार राजकीयदृष्ट्या अडचणीत आल्याची संधी साधून राज्यकर्ते त्यांच्या गटाला सहकारी संस्थांमधील विविध प्रकरणात घेरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..लोकसभेसाठी वंचितने महाविकास आघाडीकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा ; दोन आठवड्याची दिली मुदत, नाहीतर..
नागपूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक संस्थांवर केदार गटाचे वर्चस्व राहिले आहे. यातच आता सोमवारी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रावरून नवीन प्रकरण पुढे येत आहे. २०१४ ते २०२० दरम्यान नागपूर बाजार समितीतील एका प्रकरणातील खंडागळे समितीच्या अहवालाचा आधार घेत बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नियुक्तीची मागणी खोपडे यांनी केली आहे.
हेही वाचा…“वॉशिंग मशीनची बी टीम सक्रिय होतेय”, जलीलच्या लोकसभा युतीच्या प्रस्तावावर ठाकरे गटाची खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, विशेष म्हणजे हा अहवाल २३ नोव्हेंबरला शासनाकडे सादर करण्यातत आल्याचे खोपडे यांनी त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे. त्याप्रमाणे २०१७ च्या प्रकरणाचाही त्यांनी दाखला दिला आहे. दरम्यान बाजार समितीवर ताबा मिळवण्यासाठी केदार विरोधकांनी सुरू केलेले हे प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे. यातच भाजपने नागपुर शहरात लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या १२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे केदारांना मोठा धक्का देऊन त्यांचा प्रभाव करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याची टिका केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा.“८०० कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार “, महायुतीत ठिणगी, अजित पवारांवर भाजप व शिंदे गटाच्या सदस्यांचा आक्षेप
हेही वाचा…“काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा”, 6200 किलोमीटर, १४ राज्य अन् २० मार्चला मुंबईत होणार समारोप
हेही वाचा“तुम्ही प्रसाद दिला तर आमचे कार्यकर्ते महाप्रसाद देतील,” ठाकरे गटाच्या महिला नेत्याने शिंदे गटाच्या नेत्याला दिला इशारा
हेही वाचा…“भाजप हे पळपुटे, रणछोडदास..! भाजपचं काम फक्त पापड-लोणचं बनवण्याचं”, कुणी केली टिका ?
हेही वाचा..चंद्रकांत खैरेंचा पत्ता कट होणार ? अंबादास दानवे बाजी मारणार? मातोश्रीवर राजकीय हालचाली वाढल्या