पुणे : महिला आरक्षण विधेयक मंगळवारी संसदेत मांडण्यात आलं. या विधेयकावर आता लोकसभेत चर्चा होत असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत श्रेयवादावरून लढाई सुरू झाली आहे. यातच आज माझ्या सारख्या महिलांनी आरक्षण घेऊ नये असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुका २०२४ नाही तर २०२६ ला होणार, केंद्र सरकारचा मोठा प्लॅन”
ज्या महिलांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी महिला आरक्षण गरजेचे आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला महिला आरक्षणाचीही काहीही गरज नाही. माझ्यासारख्या महिलांनी हेच काय कुठलंही आरक्षण मग ते मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम असेल कुठलंही आरक्षण घेऊ नये. कारण ज्याला आरक्षण खरोखर गरजेचं आहे. त्याला त्याचा फायदा होईल. असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्याबाण चिन्ह नेमकं कुणाचं? कोर्टात ‘या’ तारखेला होणार फैसला
दरम्यान, महिलांसाठी 33 टक्के आरक्षण हे काँग्रेसने कित्येक वर्षांचं भिजत ठेवलेलं घोंगड होतं. कॉंग्रेस मित्र लालू प्रसाद यादवांनी तर लोकसभेत आरक्षणाचे कागद फाडून भिरकावले होते. अखिलेश यादवांनी कांगावा केला होता. हे जनता विसरली नाही. काल संसदेत सुप्रिया सुळेंनी महिला आरक्षणाचं श्रेय स्वतःच्या वडिलांना कॉंग्रेसला दिलं होतं. आज एकदम रंग बदलत म्हणालात की महिलांना आरक्षणाची गरज नाही.. यावरूनच स्पष्ट होतं, महिला आरक्षण तुमच्या सारख्या लोकांमुळेच अडकून राहिलं होतं. या सर्व नेत्यांच्या मनात स्त्रियांबद्दल किती आदर होता हे प्रत्येकाला कळलंय. असं भाजपने म्हटलंय.
हेही वाचा…“डुकरांची पिल्ले आणून पडळकरांचा निषेध,” अजित पवारांवरील टिका चांगलीच पडळकरांना भोवली
आरक्षण मिळाल्यावर श्रेय लाटण्यासाठी गुळाला मुंग्या चिकटाव्या तसे गोळा होत आहेत. मोदी यांनी स्त्रियांना दिलेलं आरक्षण म्हणजे त्यांना उपलब्ध करुन दिलेलं व्यासपीठ आहेत. प्रत्येक भारतीय महिला सक्षमच आहे पण तिला मागासलेपणाच्या बेड्यांनी जखडलं होतं म्हणूनच स्वातंत्र्यानंतर सहा शतकं लोटल्यानंतरही चुलीच्या धुरामध्ये तिचं भविष्य हरवलं होतं. मात्र आता दिवस बदलले… तिचं भविष्य आता उज्ज्वल झालं आहे. मागासलेपणाच्या बेड्या तुटल्या आहेत. आता ती सज्ज झाली आहे आकाशाला गवसणी घालण्यासाठी आणि तिच्या पंखात ३३ टक्के आरक्षणाचं बळ आलं आहे. असंही भाजपने म्हटलंय.
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण हे काँग्रेसने कित्येक वर्षांचं भिजत ठेवलेलं घोंगड होतं. कॉंग्रेस मित्र लालू प्रसाद यादवांनी तर लोकसभेत आरक्षणाचे कागद फाडून भिरकावले होते. अखिलेश यादवांनी कांगावा केला होता. हे जनता विसरली नाही. काल संसदेत सुप्रिया सुळेंनी महिला आरक्षणाचं श्रेय…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींकडून कोट्यवधी महिलांचा भ्रमनिराश, २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही”
हेही वाचा…ठाकरेंचा आणखी एक हुकमी एक्का अडचणीत, खिचडी घोटाळा प्रकरणात ‘या’ नेत्याची चौकशी होणार
हेही वाचा…“शरद पवार हा ब्रॅंड, नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहतं”
हेही वाचा…“पडळकरांच्या तोंडाला काळं फासा अन् एक लाख मिळवा,” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांने केलं आवाहन
हेही वाचा…“तर तु पाटीभर शेण खाणार का ?” राणेंची पडळकरांची पाठराखण, मिटकरींचा नितेश राणेंना टोला