मुंबई : राज्यातील महामारीच्या बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरुवातीला १५ दिवस कडक निर्बंध लागू केले. मात्र, रुग्णसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ पाहून, लॉकडाऊन मध्ये देखील हळूहळू राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आणि सध्या राज्यात १ जूनपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान, आज कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी देखील राज्यातल्या लॉकडाऊन बाबत वक्तव्य केलं असून, ‘सध्या राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातल्या महामारीची स्थिती अशीच कायम सकारत्मक राहिली आणि राज्यातल्या ५०% नागरिकांचं लसीकरण झालं, तरच लॉकडाऊन उठवला जाऊन नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो, अन्यथा लॉक डाऊन मध्ये दिलासा देणं महामारीला आमंत्रण देण्यासारखं आहे,’ असं त्यांनी सांगितलं आहे.
‘राज्यातला लॉकडाऊन एकदम तर उठवला जाणार नाही. मात्र राज्य सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या विचारात नक्की असल्याचं,’ त्यांनी म्हटलं आहे. तसेच, ‘याविषयीचा निर्णय कॅबिनेट बैठकीतच घेतला जाईल. मात्र, हॉटेल, सलून व्यावसायिक, इलेक्ट्रिक दुकानांना दिलासा देण्याचा निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री घेतील,’ असे संकेतही अस्लम शेख यांनी दिले आहेत.
सध्या मात्र, लॉकडाऊनमध्ये कसा दिलासा देता येईल, काय नियम असतील, कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल याचा विचार सुरु आहे. टास्क फोर्स याबाबत सूचना करतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेऊन, यासंदर्भात घोषणा केली जाईल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- ‘आपलं इतक्या वर्षांचं नातं क्षणात…सगळे खंबीर राहा!’, राज ठाकरेंचे मनसैनिकांना भावनिक पत्र
- सचिन सावंत म्हणजे “उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”
- कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तात्काळ रद्द करा; बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांची मागणी
- ‘…तर मी प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार उघडकीस आणेन,’
- शिवसेना आमदाराची गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट फसला