नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात अनेक खळबळजनक घटना घडून आल्या आहेत. पहिले हिजाब बंदी, नंतर भोंग्यांसाठी नोटीस आणि आता एका भाजपच्या कार्यकर्त्याची ग्रामविकास मंत्र्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या अशा एकामागोमाग एक घटना समोर आल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले; राज ठाकरेंचा हल्लाबोल
भाजपचे कार्यकर्ते, हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव संतोष पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याचा मृत्यू हा संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी तपास केला आणि एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये ग्रामविकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा हेच आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; पुत्र नीलचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
संतोष पाटील हे बेळगाव भाजपमधील कार्यकर्ते होते. संतोष पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहले होते. ग्रामविकास मंत्री ईश्वरप्पा यांच्या सांगण्यावरून संतोष पाटील यांनी गावातील रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र हे काम करत असताना ग्रामविकास मंत्र्यांनी कमालीचा भ्रष्टाचार केला असा आरोप संतोष पाटील यांनी केला होता.
पीडित मुलीने आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला आनंद वाटत आहे की..;
ईश्वरप्पा बिल देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे आपण त्यांना बिल देण्यास सांगावे अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे मोदींना केली होती. केलेल्या कामाचे चार कोटी रुपयांचे बील काढण्यासाठी ग्रामविकास मंत्री ईश्वरप्पा यांच्याकडून ४० टक्के कमिशन मागितले असा आरोपही संतोष पाटील यांनी केला होता. ईश्वरप्पा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आणि संतोष पाटील यांनी केलेल्या आत्महत्येला मी जबाबदार नाही असं देखील म्हटलं. पोलिसांना सुसाईड नोट सापडल्यानंतर ग्रामविकास मंत्री ईश्वरप्पा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता ईश्वरप्पा यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. या सर्व प्रकारचे उत्तर न्यायालयीन मार्गाने देऊ असं ग्रामविकास मंत्री ईश्वरप्पा यांनी म्हटलं आहे.
Read also:
- ” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा”; आव्हाडांचं राज ठाकरेंना तिखट उत्तर
- ..तर हिंदू जागा झाल्यास सरकारचं अवघड होईल ; नितेश राणेंनी सरकारवर डागली तोफ
- “मुंब्र्याचा आव्हाड हा तर फणा काढलेला साप”; राज ठाकरेंनी केली आव्हाडांची नक्कल
- “राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील”; ठाण्याच्या सभेत वसंत मोरेंची तोप धडाडली
- माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता; सलिम मामा शेख यांचा ठाण्यातून एल्गार