मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या २० जून रोजी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याला आता वर्षपुर्ती होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून २० जून रोजी खोकेवीरांच्या वर्षपुर्तीनिमित्त गद्दार दिवस आंदोलन राज्यभरात राबवावे असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनी केले आहे. तर २० जून हा जागतिक गद्दार दिवस साजरा करण्यात यावा, असं पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांना दिलं आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या बंडला एक वर्ष पुर्ण, ‘NCP’ गद्दार दिवस आंदोलन साजरा करणार, घोषणांही ठरल्या
अंबादास दानवे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकवेळा आपल्या भेटीगाठी झाल्या, आपण महाराष्ट्रात असताना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारला वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम अविरत चालू ठेवले होतेच! ते कमी झाले की काय म्हणून महाराष्ट्रात आपल्या दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सूर्याजी पिसाळ – खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
हेही वाचा…“कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी…,” देवेंद्र फडणवीसांनी दिला विरोधकांना इशारा
याची परिणती २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले. असे म्हणतात ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतली.जर अशा गद्दारीची जगातील एवढ्या देशातील जनतेचे लक्ष वेधले जात असेल तर हा दिवस “जागतिक गद्दार दिन” साजरा होवू शकतो, तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत ” युनो” कडे प्रयत्न करावे, अशी मी आपणास विनंती करतो. असं दानवेंनी म्हटलं आहे.
जर गतवर्षी झालेल्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली होती, तर २१ जून रोजी जगभरात ‘गद्दार दिवस’ साजरा करण्यात यावा. या कांडात आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आपल्यामुळे नावारूपाला आलेल्या या दिवसाला साजरा करण्यासाठी आपण आपले दिल्लीचे पातशाह यांच्या मार्फत संयुक्त राष्ट्राकडे… pic.twitter.com/66gge33gd2
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?
हेही वाचा…राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोण मुख्यमंत्री, कुणाची सत्ता ? एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“उद्धव साहेब, तुम्ही फक्त संजय राऊतांना बाजूला करा, तीच शिवसेना उभी करू”
हेही वाचा…ठाकरेंना धक्का देत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर NCP अन् काॅंग्रेसमध्ये चुरस, तातडीची बैठक बोलवली
हेही वाचा…बीआरएसची महाराष्ट्रात “हायटेक” रणनीती, सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचला BRS पक्ष