नागपुर : काॅंग्रेसचे निलंबित माजी आमदार आशिष देशमुख यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यातच काल मुंबईत उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी मेळाव्यात फडणवीसांवर टिकास्त्र सोडलं. तर फडणवीसांनी देखील ठाकरेंवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”
सध्या देवेंद्र पडणवीस यांची अवस्था अशी झाली आहे की, त्यांना सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. असा टोला ठाकरेंनी फडणवीसांवर लगावला. त्यावर काय होतास तु काय झालास तु, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तु असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर पलटवार केला. त्यानंतर कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होऊ शकत नाही. असंही फडणवीसांनी म्हटलं आहे..
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती
उद्धव ठाकरेंचं भाषण लिहिणारे जे स्किप्ट रायटर होते ते आता शिंदेंच्या पक्षात चालले आहेत. त्यामुळे आता ठाकरेंना काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उधारीवर स्क्रिप्ट रायटर घ्यावे लागत आहेत. २०१९ साली भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजणी ठाकेंनी दिली. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत खुर्चीच्या मोहाला लागले. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचे तिखट वार, देवेंद्र फडणवीसांचे पलटवार,” ठाकरे अन् फडणवीसांमुळे राजकारण तापलं
हेही वाचा…“भाजपच्या नेत्या, ते शिवसेनेच्या आक्रमक आमदार,” वाचा मनिषा कायंदेंचा राजकीय प्रवास
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसजी…!, जर हिमंत असेल तर..,”” उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आवाहन
हेही वाचा…ठाकरेंना मोठा धक्का.! शिवसेनेच्या आक्रमक महिला आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…*ते माझे पाप…मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कितीदा घर सोडलं,” नारायण राणेंचा गौप्यस्फोट*