मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी निशाणा साधत त्यांनी दुसऱ्या मंत्र्याकडे पदभार द्यावा अशी मागणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे पदभार द्यावा असा सल्ला दिला. मात्र यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर विश्वास नसावा असा टोलाही लगावला. विरोधकांच्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र नाराजी व्यक्त करत सुनावलं होतं. दरम्यान यावरुन चंद्रकांत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.
सतेज पाटील, हसन मुश्रिफांपाठोपाठ आता आमदार राजेश पाटीलही जिल्हा बँकेत बिनविरोध
काल विधानसभेच्या सदनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन सुरु असणाऱ्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आव्हाड यांनी, “विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते,” असं सांगितलं.
पुढे बोलताना, “मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाहीय. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवानामध्ये येणार. ते अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे,” असंही आव्हाड म्हणाले.
“आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय स्वत:हून नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणं हेच मला मुळात विकृतपणाचं, बालिशपणाचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी
“जितेंद्र आव्हाडांची संस्कृतीच दुसऱ्यांचा बाप काढण्याची आहे. माझ्या बापाने निवडणूक लढवली नाही. निवडणूक लढवणारा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी बांधिल असतो. माझा बाप एका मिलमध्ये कामगार होता. अपघात झाल्यानंतर ११ महिने ते बेडवर होते. बरे झाल्यानंतर पुन्हा ते मिलमध्ये गेले आणि त्यावेळी ते स्वतःची नोंद कामगार म्हणून करत होते. जर उद्धव ठाकरेंना ते बाप मानत असतील आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या बापाने या फंद्यात पडायला नको होते. निवडणूक लढवून आपण मुख्यमंत्री झालात तर १२ कोटी लोकांना आपण उत्तर देण्यासाठी बांधिल आहात. त्यामुळे त्यांनी मला उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबद्दल समजून सांगण्याची गरज नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read also:
- मनसेला मोठं खिंडार: औरंगाबादेतील तब्बल 53 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होऊन प्रचाराला सुरुवात; जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज नेत्यांचा कस लागणार
- फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला
- माजी मंत्री अनिल राठोडांच्या पुत्रास विधानसभेच्या उमेदवारीवरून जीवे मारण्याची धमकी; अहमदनगर शहरात खळबळ
- “हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात