कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन राज्यभरात चक्का जाम, तसेच जेल भरो आंदोलन करण्यात येत आह. राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन छेडण्यात येत आहे.
“एकमेकांच्या चुका काढून दाखवण्यापेक्षा एकत्र येऊन लढा उभारू”, वडेट्टीवारांचे विरोधकांना आवाहन
दरम्यान, कोल्हापूर शहरात भाजपच्या वतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी यांनी माध्यमांशी बोलताना आघाडी सरकारवर जोरादर टीका केली. “जोपर्यंत राज्य सरकार इम्पेरिकल डेटा सादर करणार नाही, तोवर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही,” असे म्हणत त्यांनी, “भुजबळांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांची आणि फडणवीसांची कोल्हापूरातील बिंदू चौकात जाहीर चर्चा होऊ द्या. तेव्हा ओबीसी समाजाची दिशाभूल कोण करत आहे,हे जनतेला कळून चुकेल”, असं म्हटलं आहे.
जोपर्यंत राज्य सरकार इम्पेरिकल डेटा सादर करत नाही तोवर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही. छगन भुजबळ यांना माझे जाहीर आव्हान आहे, छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापूर येथील बिंदू चौकात चर्चा होऊ द्या. ओबीसी समाजाची दिशाभूल कोण करत आहे हे कळेल. pic.twitter.com/XOdRb6wtAP
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 26, 2021
तसेच, “ओबीसी समाजाला त्यांचे राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावर उतरून संघर्ष करतच राहू. पण त्यांना त्यांचे हक्क मिळवून देऊ आणि यासाठी एकदा काय, हजार वेळा अटक होण्यास तयार आहे,” असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
यावेळी, “इम्पेरिकल डाटा हा राज्याचा मागास आयोगाने तयार करायचा असतो. त्याचा केंद्राशी काय संबंध? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जसा गायकवाड आयोगाने ५ लाख लोकांचा सॅम्पल सर्वे केला, तसा सॅम्पल सर्वे सरकारला करायचा आहे, इम्पेरिकल डाटा म्हणजे जनगणना नाही आणि जोवर हा डेटा सरकार तयार करत नाही, तोपर्यंत राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही,” असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं.
Read Also :
- “ही वेळ सरकारने आमच्यावर आणली” फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सोमवारपासून बदलणार नियम; वाचा नवीन नियमावली
- न्यायालयात ईडीकडून केले गेले मोठे खुलासे, देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता!
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
- देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मात्र आंदोलनातला जोर तसूभरही कमी नाही