मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत असून, राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपकडून हे चक्का जाम आंदोलन आज राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
दरम्यान, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला असून, “संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायाचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. पण, त्यामुळे महामारीची फैलाव वाढण्याचा धोका आहे,” असे बोल त्यांनी लगावले आहेत. मुख्यमंत्री, आज कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सोमवारपासून बदलणार नियम; वाचा नवीन नियमावली
आता यावर फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिले असून, “महामारी काळात आम्हाला गर्दी करण्याचा शौक नाही. सरकार जागे झाले असते, आज आमच्यावर आंदोलन करून मागण्या करण्याची वेळ आली नसती. या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे, आमच्यावर आंदोलन करून सरकारला जाग करण्याची वेळ आणि गर्दी करण्याची वेळ आली. याला सरकार जबाबदार आहे. यासाठी आंदोलनच नाही, तर जे-जे करण्याची वेळ येईल ते-ते आम्ही करणार,” असं भाष्य त्यांनी केलं आहे.
Read Also :
- प्रतिक जयंत पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली ‘ही’ मागणी
- रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी
- न्यायालयात ईडीकडून केले गेले मोठे खुलासे, देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता!
- सचिन वाझेनं ईडीला दिलेल्या जबाबात केला, अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री