सिंधुदुर्ग : भाजपशी युती करुन उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या रामदास आठवले यांच्या ‘रिपाइं’ला महाराष्ट्रातच बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. रिपाईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी रामदास आठवले यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. रामदास आठवले हे मंत्रिपदासाठी लाचार झाले आहेत. असा लाचार झालेला नेता आम्हाला नको, अशा शब्दांत रतन कदम यांनी आठवले यांच्यावर तोफ डागली आहे.
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
त्यामुळे आता रामदास आठवले स्वपक्षातील नाराजी दूर करण्यासाठी काय पावले उचलणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे. रतन कदम यांनी थेट आणि बोचऱ्या भाषेत आठवले यांच्यावर प्रहार केला आहे. रामदास आठवले यांनी जातीयवादी भाजपशी युती केली तेव्हापासूनच आंबेडकरी जनता रामदास आठवले यांच्याविरोधात गेली आहे. पूर्वीचा पँथर वाघ असलेला रामदास आठवले आम्हाला नेता म्हणून हवा होता, मंत्रिपदासाठी लाचार झालेला रामदास आठवले आम्हाला नकोय. आम्ही भाजपचं मिशन कमळ कधी ही यशस्वी होऊ देणार नाही, असे रतन कदम यांनी म्हटले.
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. यावेळी आठवले यांनी पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी, असा प्रस्ताव मांडला होता. उत्तर प्रदेशात रिपाइंचे संघटन चांगले आहे. उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने आपल्याकडे वळविला आहे. मात्र, आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा आपल्याकडे वळवता येईल. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आरपीआयला भाजपने सोबत घ्यावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले होते.
Read Also :
- सचिन वाझेनं ईडीला दिलेल्या जबाबात केला, अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा
- “प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल”- संजय राऊत
- पिंपरीत पंकजा मुंडे, महेश लांडगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
- परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न