मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, राज्यात मोठी खळबळ उडाली. यामुळे एकीकडे मराठा समाज नाराज झाला असून, निकालानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर, विरोधकांनी देखील मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली.
यावरून खासदार आणि छत्रपती संभाजी राजे यांनी एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. तसेच, मुख्यमंत्र्यांना अजून एक पत्र लिहून त्यांनी, शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली होती. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना आज अजून एक पत्र लिहिले असून, “मराठा आरक्षण टिकविण्यासाठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल करावी,” अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
मराठा आरक्षण टिकविण्यासाठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल करावी, याबाबत मा. मुख्यमंत्र्यांस पत्र लिहिले… pic.twitter.com/bSEenLozmS
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 14, 2021
पत्रात लिहिले आहे ते थोडक्यात – “मराठा आरक्षणाचा विषय हा राज्यशी, तसेच राज्यातल्या प्रशासनाशी थेट संबंधित आहे.तसेच, राज्य मागासवर्ग आयोगाचा पूर्ण अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवताना, उर्वरित त्रूटी दूर करण्यासाठी आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी ठाकरे सरकारने देखील सर्वोच्च न्यायालयात केंद्रप्रमाणे फेरविचार याचिका दाखल करण्याविषयी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे”, असे त्यांनी लिहिले आहे.
दुसरीकडे राज्य सरकारने यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन, त्यांच्याकडे मराठा आरक्षणसंदर्भातले पत्र राष्ट्रपतींकडे देण्यासाठी सुपूर्त केले आहे. तसेच, येत्या काळात पंतप्रधानांचादेखील भेट घेऊन त्यांना देखील पत्र देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
Read Also :
- अतुल लोंढेंची “चाय पे” टीका, म्हणाले चहामुळे आमच्याकडे…
- मराठा आरक्षण : ‘तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार’
- ‘राज्याचा आभासी कारभार करणाऱ्यांना, असले राजकारण शोभत नाही’
- मराठा आरक्षण.! केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे – आमदार महेश लांडगे
- ‘मराठा समाजाचं आंदोलन होऊ नये म्हणून लॉकडाऊन वाढवला’