मुंबई : केंद्र सरकारच्या नीती आयोगाप्रमाणेच राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन- मित्र’ स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ‘मित्र’ हे राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारी थिंक टँक असेल. राज्य सरकारचे विविध विभाग, केंद्र सरकार, नीती आयोग, सामाजिक संस्था, विविध अशासकीय संस्था तसेच खासगी व्यावसायिक संस्था यांच्यात राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने समन्वय तसेच सल्ला देण्याचे काम करील. याचं कार्यालय मुंबईत होत असून यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च होणार आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…फडणवीस पेक्षा ठाकरे वरचढ..! फडणवीसांच्या ५ वर्षापेक्षा फक्त अडीच वर्षात ठाकरेंची कामगिरी दमदार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे. राज्याच्या विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र‘ संस्थेचे कार्यालय नरिमन पॉइंट येथील निर्मल भवन या इमारतीमध्ये स्थानांतरित केले आहे. मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला. मित्र संस्थेवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राची वर्णी लावली असून आता या मित्राला बसण्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून देऊन ऐसपैस कार्यालयही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा…सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर ह’ल्ला, गाडीच्या काचाही फोडल्या, वाघमारे गंभीर जखमी
दरम्यान, सरकारी तिजोरीतून पैसे ओरबडण्यासाठी महायुती सरकारची ही एक आणखी नवीन स्कीम आहे. खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेश विकास करणे हा ‘मित्र’च्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र खाजगी क्षेत्रात असलेल्या आपल्या मित्र परिवारातील लोकांवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे. असंही त्यांनी सांगितले.
“मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी.
मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे.
राज्याच्या विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शेतकरी कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला भाजपाने दिली मोठी जबाबदारी, भाजपची शहर कार्यकारीणी जाहीर
हेही वाचा…काय सांगता..! ‘या’ राज्यात 1 उंदीर पकडण्यासाठी ४१,००० हजार रूपये झाले खर्च, आव्हाडांचा सरकारला जोरदार टोला
हेही वाचा…“शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही”, चिठ्ठीत लिहून तरूणाची आ’त्म’ह’त्या’, सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका
हेही वाचा…काॅंग्रेसने दिली ‘६’ गॅरंटी आश्वासने, कर्नाटकानंतर आता ‘या’ राज्यांवर नजर, सत्ता आल्यास पहिल्यास कॅबिनेट बैठकीत निर्णय
हेही वाचा…“रडायला भरपूर वेळ आहे, पण..,” अधिवेशनाच्या पूर्वीच मोदींचा विरोधकांना खोचक टोला