मुंबई : मागील काही दिवसापासूून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद यांच्यात वाद सुरू झाला. ऊर्फीच्या कपड्यावरून चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत ऊर्फीच्याविरोधात महिला आयोगांवर आरोपांची राळ ओकली. यातच आता ऊर्फी जावेदने महिला आयोगाला एक पत्र लिहून मला सध्या असुरक्षित वाटत आहे. तसेच वैयक्तिक प्रसिद्धिकरीता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या जात असल्याने मला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी ऊर्फीने महिला आयोगाकडे केली आहे.
“केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा”; राष्ट्रवादीने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुनावलं
ऊर्फीने महिला आयोगाकडे सुरक्षासंबंधात अर्ज केला आहे. त्यावरून लगेचच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना याप्रकरणाबाबत कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगास ऊर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमुद करतात की, मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रिमध्ये काम करत आहे, माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे, असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वत:च्या राजकीय फायद्याकरीता किंवा वैयक्तिक प्रसिद्धकरीता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत.
“अमितभाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे शिंदे साहेब”
सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही, म्हणून मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,”मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023
Read also
- नाशिकनंतर औरंगाबादमध्येही रंगत..! अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीने पक्षातूनच काढून टाकलं
- “मातोश्रीच्या अंधाऱ्या गुहेत जाणारे पैसेही बाहेरची वाट..;” शितल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- शिंदे गटावर मोठा अन्याय…! 5 ही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वत:चा उमेदवार नाही
- “राऊतांना आवडणारा उकीरडा कोण, हे सांगण्याची गरज आहे का?” भाजपने संजय राऊतांना डिवचलं
- “गद्दारांनी स्वत:ला विकलं आता आमच्या मुंबईला विकू नका”