मुंबई : राज्याच्या राजकारणात अजून एक मोठा राजकीय भुंकप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य ९ आमदारांनी काल राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु या सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याने राजकीय चर्चेांना उधाण आलं आहे. यातच आज शरद पवार यांनी कराडमधून मोठी घोषणा केली आहे.
हेही वाचा…“मुंबईचे सगळे दरोडेखोर आज एकत्र जमले, चौकशा सुरू झाल्या अन्…,” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादी जे काही झाले त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचं कराडमधून शरद पवार यांनी म्हटलं आहे. सामान्यांच्या लोकशाहीचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न केला जात असून तो जतन केला पाहिजे. असंही त्यांनी नमुद केलं आहे.
हेही वाचा…“ज्या दिवशी आमचं सरकार येईल, त्या दिवशी बुलडोझर चालवू”, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना इशारा
यशवंत चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून देणार. महाराष्ट्रात देशात धार्मिक संघर्ष पेठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसने देखील “विरोधी पक्षनेते” पदावर ठोकला दावा, जितेंद्र आव्हाडांचं पुढे मग काय ?
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचा पत्ता कट…! अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता…,राजकीय हालचालींना वेग”
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार, अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ? तर बाकीच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अॅक्शन मोडवार…! कराड रवाना, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
हेही वाचा…सगळ्या भ्रष्टाचार नेत्यांना सामावून घेईन, असा त्याचा अर्थ होतो का ? अरविंद केजरीवालांचा मोदींना सवाल