मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे सगळे दरोडेखोर एकत्र जमले आहेत. गेल्या वीस पंचवीस वर्ष या लोकांनी मुंबईची तिजोरी लुटलेली आहे. मुंबईकरांचा पैसा लुट केला आहे. त्यामुळे मुंबईकर गेले अनेक वर्ष खड्यांमध्ये अपघात आणि अनेक लोकांचे बळी गेले आहेत. याला जबाबदार तेव्हाचे सरकार होते. कोवीड काळात पैसे कुठे खायचे याचं तरी त्या माणसांनी तारतम्य बाळगले पाहिजे होते. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर लगावला. मुंबई महानगरपालिकेवर आज ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावर ते बोलत होते.
हेही वाचा…“बाळासाहेब आता हयात असते तर आदित्य ठाकरेंना लाथ मारून बाहेर काढलं असतं”
कोविडच्या नावाखाली इकडे पैसे कमवत होते. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार झाला. त्यांच्या आता चौकशा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तिकडे मोर्चे निघत आहेत. या लोकांनी मुंबईकरांच्या पैशाचा चुराडा केला आहे. आमचं सरकार आल्यानंतर मुंबईकरांना सुविधा देत आहे. चांगल्या कॉंक्रीटचे रस्ते या ठिकाणी आम्ही देत आहोत. चांगले दवाखाने मुंबईकरांना देत आहोत. त्यामुळेच या लोकांची पोटदुखी वाढली आहे. असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर “या” गोष्टी करा अपघात टाळा..! अपघात टाळण्यासाठी दानवेंनी सुचवल्या ‘सात’ गोष्टी
जे लोक मोर्चा काढत आहेत. त्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. दुध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. सत्य समोर आलं पाहिजे. बुलडोझर आला आता घाबरून त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. तुरूंगात जातील म्हणून त्यांना आता मोर्चा काढावा लागत आहे. मुंबईतील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे जनता यांना येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही शिंदेंनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्या दिवशी आमचं सरकार येईल, त्या दिवशी बुलडोझर चालवू”, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना इशारा
हेही वाचा…“अपघातात एखादा व्यक्ती गेला की लोक बोलतात, तो ‘देवेंद्रवासी’ झाला”, शरद पवारांचा फडणवीसांना टोला
हेही वाचा…“मला पप्पू बोलतात ना…पप्पू चॅलेंज देतो..या माझ्या अंगावर…छातीवर वार करा”, आदित्य ठाकरेंचं चॅलेंज
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेचा सातबारा फक्त शिवसेनेच्या बापाच्या नावावर”, धडक मोर्चातून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
हेही वाचा…भाजपच्या कॅनॉलमधून “राहुल कनाल” ला आता शुद्ध करणार का ? सुषमा अंधारेंचा भाजप अन् शिंदेंना सवाल