मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची शिफारस केली आहे.
हेही वाचा…“ज्या दिवशी आमचं सरकार येईल, त्या दिवशी बुलडोझर चालवू”, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना इशारा
जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेता तसेच मुख्य प्रतोद म्हणून नेमणुक करण्यात यावी, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते आणि प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांच्या नियुक्तीचे शिफारस पत्र राष्ट्रवादीने दिले असले तरीही काॅंग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काॅंग्रेसचे पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांची नावे या दृष्टीने चर्चेत आहेत.
हेही वाचा…“अपघातात एखादा व्यक्ती गेला की लोक बोलतात, तो ‘देवेंद्रवासी’ झाला”, शरद पवारांचा फडणवीसांना टोला
विरोधी पक्षांचा विचार करता काँग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असेल. या पक्षाचे ४५ आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे चालून जाईल. ठाकरे गटाचे केवळ १५ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडेच उद्धव ठाकरे यांच्यासह ११ आमदार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचा पत्ता कट…! अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता…,राजकीय हालचालींना वेग”
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार, अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ? तर बाकीच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अॅक्शन मोडवार…! कराड रवाना, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
हेही वाचा…सगळ्या भ्रष्टाचार नेत्यांना सामावून घेईन, असा त्याचा अर्थ होतो का ? अरविंद केजरीवालांचा मोदींना सवाल
हेही वाचा…“मुंबईचे सगळे दरोडेखोर आज एकत्र जमले, चौकशा सुरू झाल्या अन्…,” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल