मुंबई : राज्याच्या राजकारणात अजून एक मोठा राजकीय भुंकप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य ९ आमदारांनी काल राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु या सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याने राजकीय चर्चेंना उधाण आलं आहे. यातच आज शरद पवार कराडला रवाना झाले आहेत.
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेचा सातबारा फक्त शिवसेनेच्या बापाच्या नावावर”, धडक मोर्चातून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील घडामोडीनंतर शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तर कालच त्यांनी उद्या यशवंत चव्हाण यांच्या समाधीवर जाऊन आशीर्वाद घेणार असल्याचं काल सांगितले होते.
“मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला अन् नेते फुटले,” शरद पवारांचं वक्तव्य
दरम्यान, शरद पवार आता कराडला रवाना झाले असून त्यांचं खेड शिवापुर येथे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आहे. आज कराड येथे जाऊन यशंवत चव्हाण यांच्या समाधीवर जाऊन शरद पवार आशीर्वाद घेणार आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना प्रंचड वेग आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सगळ्या भ्रष्टाचार नेत्यांना सामावून घेईन, असा त्याचा अर्थ होतो का ? अरविंद केजरीवालांचा मोदींना सवाल
हेही वाचा…“मुंबईचे सगळे दरोडेखोर आज एकत्र जमले, चौकशा सुरू झाल्या अन्…,” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…“ज्या दिवशी आमचं सरकार येईल, त्या दिवशी बुलडोझर चालवू”, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना इशारा
हेही वाचा…“अपघातात एखादा व्यक्ती गेला की लोक बोलतात, तो ‘देवेंद्रवासी’ झाला”, शरद पवारांचा फडणवीसांना टोला
हेही वाचा…“मला पप्पू बोलतात ना…पप्पू चॅलेंज देतो..या माझ्या अंगावर…छातीवर वार करा”, आदित्य ठाकरेंचं चॅलेंज