मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जीवनावर आधारीत कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा पार पडला. पुणे येथे पुरंदर पब्लिकेशनतर्फे हा पुस्तक सोहळा आयोजित कऱण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आपला माणुस मुख्यमंत्री पदावर बसायला हवा होता. अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त करून दाखविली आहे.
“दादा तुम्ही फक्त पुण्याचे मंत्री नाही, महाराष्ट्राकडेही लक्ष्य द्या”
राष्ट्रवादीत असे अनेक लोक आहेत. ज्यांना अनेकावर्ष कोणतही पद मिळालेलं नाही. तरीही ते लोक पक्षावरच्या निष्ठेपायी, पवार साहेबांच्या विचारांपायी, विचारधारेवच्या श्रद्धेपोटी पक्षाचं काम अतिशय तळमळीने करतात. महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष चाललं. पण सहकारी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कुणालाच काही देऊ शकलो नाही. असं जयंत पाटील म्हणाले.
“आता पोलिस भरती, महिनाभरात ग्रामविकास विभागाची भरती”; फडणवीसांनी विरोधकांची केली बोलती बंद
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला पाहिजे असं सरकार कधी चालतं ज्यावेळी आपला माणुस मुख्यमंत्रीपदावर बसलेला असतो. लोकांच्या मनात स्थान असलेले. प्रेम लाभलेले, लोकांना समजून घेणारे अनेक नेते महाराष्ट्राला लाभले आहेत. या यादीत अजित पवार यांचा उल्लेख टाळता येणार नाही. स्पष्टवक्ते, वेळेचे अचूक नियोजन, लोकांसाठी सदैव उपलब्ध असणारे आणि कार्यतत्परता या गुणांमुळेच दादा लोकप्रिय आहेत. असंही ते म्हणाले.
Read also
- “राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर राज्यातील सरकार कोसळणार.!” दोन नेत्यांचं सुचक वक्तव्य
- राज्यात वेदांता, एअरबसवरून महाभारत सुरू असताना अजित पवार गायब..! आहेत तरी कुठे?
- महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणारे संभाजी भिडे समाजातली विकृती
- “मग मिश्या काढणाऱ्याना नपुंसक समजतात का ?” राष्ट्रवादीचा भिडेंना खोचक सवाल
- “दोन कोटीचं घड्याळ सापडलं ते कुठं होतं..”; सुषमा अंधारेंची सोमय्या स्टाईल टोलेबाजी