मुंबई : तब्बल नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना सरकारला वेळ वाढवून दिला आहे. मात्र २४ डिसेंबर की २ जानेवारी यावरून मोठा घोळ निर्माण झाला आहे.
हेही वाचा…“मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळणार, परंतु त्यासाठी..,” निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमांतून जरांगे पाटलांशी चर्चा
मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी नेमकी कोणती डेडलाईन आहे. यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…मराठा आंदोलनाची धग कायम, राज्यात आज काय काय घडलं ?
मनोज जरांगे पाटील यांनी लिखीत आश्वासनानंतर काल आमरण उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबर ही तारिख लिखीत मिळाली असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. तर तीस नोव्हेंबरला सरकार कोसळणार असल्यानं जरांगे पाटील यांना २४ डिसेंबर ही तारिख देण्यात आलीय. राऊतांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कायद्याच्या चौकटीतले टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणार”, एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिला शब्द
हेही वाचा…“अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे !” देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“तब्बल ९ दिवस अन्नशिवाय उपोषण,” मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यविषयी आली मोठी माहिती
हेही वाचा…“अजित पवार गटात गेलेला शरद पवारांचा शिलेदार पुन्हा परतला, जोरदार स्वागत करत दिला प्रवेश
हेही वाचा…निवृत्त न्यायमूर्तींना मनोज जरांगे पाटलांनी केले कडक सवाल? मराठ्यांना आरक्षण मिळणार का ?