मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. कायदेतज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिली घटना असेल. दोन महिन्यांची मुदत मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने पाऊले टाकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.
हेही वाचा…मराठा आंदोलनाची धग कायम, राज्यात आज काय काय घडलं ?
न्या. शिंदे समितीला अधिक सक्षम करण्यात येईल, आवश्यक ते मनुष्यबळ देण्यात येईल. यंत्रणा वाढवून देण्यात येईल. कुणबी प्रमाणपत्रे देण्याची अंमलबजावणी वेगाने करण्यात येईल. सरकार म्हणून मराठाच नाही तर इतर कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. इतर समाजावर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा…नितेश राणेंचं पोस्टर गाढवाला लावून दिलं आव्हान, मराठा समाज राणेंच्या विरोधात आक्रमक
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी परवा मनोज जरांगे यांच्याशी बोललो होतो, त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारे, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे. आजपर्यंत १३ हजार ५१४ नोंदी सापडल्या आहेत ही मोठी गोष्ट आहे. न्या. शिंदे समितीने दिवसरात्र काम केले. समितीने मुदत मागितली हे देखील मी जरांगे पाटील यांना सांगितले आहे. मी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले होतेच की यासंदर्भात चर्चेतून व संवादातून हा प्रश्न सोडवायचा आहे.
हेही वाचा…शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी संपली, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी
सर्वोच्च न्यायालयातल्या क्युरेटिव्ह याचिकेवर पण आपण काम करतो आहोत. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी मराठा आरक्षण रद्द करतेवेळी जे निरीक्षण नोंदवले होते ते विचारात घेऊन राज्य शासनाने काल स्थापन केलेली न्यायाधीशांची समिती शासनाला आणि आयोगाला मार्गदर्शन करते आहे. मराठा समाज मागस कसा हे पाहण्याचे काम मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून करण्यात येईल. कायद्याच्या चौकटीतले टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी अतिशय गांभीर्याने काम करेल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे !” देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“तब्बल ९ दिवस अन्नशिवाय उपोषण,” मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यविषयी आली मोठी माहिती
हेही वाचा…“अजित पवार गटात गेलेला शरद पवारांचा शिलेदार पुन्हा परतला, जोरदार स्वागत करत दिला प्रवेश
हेही वाचा…निवृत्त न्यायमूर्तींना मनोज जरांगे पाटलांनी केले कडक सवाल? मराठ्यांना आरक्षण मिळणार का ?
हेही वाचा…“मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळणार, परंतु त्यासाठी..,” निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमांतून जरांगे पाटलांशी चर्चा