मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर आता राष्ट्रवादीचं पक्ष फुटीचं प्रकरण निवडणुक आयोगात गेलं आहे. यातच येत्या ६ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादीच्या पक्षनाव आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडणार आहे. परंतु निकाल कुणाच्या बाजूने लागणार याची चर्चा सध्या सुरू आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, जु्न्नरचं राजकारण तापणार
पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. पक्षातला एक गट बाहेर गेलेला आहे. मात्र, बाहेर गेलेल्या नेत्यांकडून स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाबाबत भाष्य केले जात आहे. जे पक्षातून बाहेर गेलेत ते निवडणूक आयोग झाले आहेत का ? त्यांचे नेते आयोगाचे अध्यक्ष आहेत का ? निवडणूक आयोगाने वेगळी काही बातमी दिल्लीच्या अदृश्य हातांनी त्यांना दिली आहे का ? मग, आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळणार का नाही? धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर याचा अर्थ पेपर फुटला आहे. पेपर फुटला असेल तर आम्ही आयोगाला नक्की प्रश्न विचारू, ही तारीख यांना कशी कळाली? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
हेही वाचा…“बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी,” मंत्री दिपक केसरकर म्हणाले की..,”
निवडणुक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर ५५ वर्षानंतर शिवसेनेची अधिकृत सुत्रेही उद्धव ठाकरेंच्या हाती दिलीत. उद्धव ठाकरे यांच्या हातात जेव्हा शिवसेना आली तेव्हा आजचे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकारिणीत देखील नव्हते. उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्याचे नगरसेवक होते. निवडणुक कुणाचं दुकान आहे का ? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…“बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी”, वडेट्टीवारांची राज्य सरकारकडे मागणी
हेही वाचा…“चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची काही घटकांकडून भूमिका”,शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“पालिकेकडून कोटींचा निधी लाटला, पण अद्यापही कामांना सुरूवात नाही”, शिंदे सरकारमधील ‘या’ आमदारांचा अजब कारभार
हेही वाचा…आमदार बेनकेंची डबल ढोलकी सुरूच, काल साहेबांच्या मंचावर, तर ७ ला दादांचा जंगी कार्यक्रम