मुंबई : मुंबई पोलिस दलात खळबळ माजवून देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील आठ महिला पोलिसांनी पोलिस उपायुक्त, दोन नरिक्षक, तीन कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोपा केला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुत्त यांना पत्र लिहिलं आहे. सध्या हे पत्र मुंबई पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर फिरत असून सोशल मीडियावरही हे पत्र व्हायरल झालं आहे. या लेटरबॉम्बने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठांनी याबाबत सारवासारव केली जात आहे.
हेही वाचा..भाजपने लोकसभेसाठी वेगळी रणनिती आखली, ४० ते ५५ वर्षाच्या उमेदवारांना भाजप मैदानात उतरवणार
पोलिस दलात महिलांनी अशा पद्धतीने आरोप केल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. राज्यातील महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील महिलाच सुरक्षित नाहीत. कुंपणच शेत खात असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ स्वत: ची खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत. इतकं निष्क्रिय गृहमंत्री या राज्याला कधी लाभला नाही. अशी टिका प्रशांत जगताप यांनी केलीय.
हेही वाचा…“जोपर्यंत मी जितेंद्र आव्हाड यांना भेटत नाही”, कर्करोगाशी लढणाऱ्या तरूणाने आव्हाडांसमोर ठेवली ‘ही’ इच्छा
मोटर परिवहन विभागातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिलं असून पत्रात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला आहे. दोन पोलिस निरिक्षक आम्हाला सरकारी वाहनातून घरी घेऊन गेले आणि उपायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी आमच्यावर तेथे बलात्कार केला आहे. पती तसेच इतर कुटुंबीय गावी असल्याने आम्ही महिला मुंबईत एकट्याच राहत असून पोलीस दलाबाबतही फारशी माहिती नाही. याचाच गैरफायदा घेऊन हे अधिकारी आम्हाला वारंवार शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहेत. हे सर्व कायमचे थांबविण्यासाठी आम्ही उपायुक्तांची भेट घेतली. परंतु त्यांनी आम्हाला केबिनमधून हाकलून लावल्याचं पत्रात म्हटलं आहे.
आमच्यावरील अत्याचार इतक्यावर थांबले नाहीत. तर उपायुक्तांचे ऑपरेटर ऑर्डली आणि चालकांनीही वेळोवेळी धमकावून अधिकाऱ्यांच्या कार्यालायतचा आमच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पत्रात केलं आहे. या प्रकरणाची सीबीआय, गुन्हे शाखा तसेच सायबर सेलमार्फत चौकशी करावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे. अत्याचार करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे छायाचित्रे आणि व्हिडीओ असून त्यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण होणे गरजेचे असून या शरीरसंबंधांतून काही महिला गर्भवती राहिल्या. अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यामुळे या महिलांची वैद्यकीय तपासणी करणेदेखील महत्वाचे असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला. त्यामुळे यासंदर्भात आता पुढील काय कारवाई करण्यात येईल. ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यातील महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस दलातील महिलाच सुरक्षित नाहीत.
कुंपणच शेत खात असताना गृहमंत्री फडणवीस केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत. इतकं निष्क्रिय गृहमंत्री या राज्याला कधी लाभला नाही. pic.twitter.com/kYBT2extKi— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) January 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“हिंदू धर्मातील गद्दारांनी शरद मोहोळची हत्या केली”, भाजपच्या आमदाराच वादग्रस्त विधान
हेही वाचा…लोकसभेसाठी काॅंग्रेसने इच्छुकांचे मागितले अर्ज ; पुणे लोकसभेसाठी ‘या’ नेत्यांची जोरदार चर्चा
हेही वाचा…अजितदादा अन् शिंदेंच्या वादात भाजपचा गेम होणार ? लोकसभेच्या जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी
हेही वाचा…पोलिस दलात खळबळ माजवून देणारी बातमी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ८ महिला पोलिसांवर कार्यालयातच ब’ला’त्का’र
हेही वाचा..“फडणवीसांच्या गळ्यात सध्या दिल्लीचा गुलामीचा पट्टा “, ठाकरे गटाचा जोरदार पलटवार