पुणे : भाजपसाठी कार्यकर्त्यांनी मला पद आणि घर सोडायला लावलं तरी मी पक्षासाठी सोडायला तयार आहे. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधतांना येत्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या त्यागाचं मुल्यमापन केलं जाणार असल्याचं सांगितलं. आज भाजपची राज्य कारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत फडणवीस बोलत होते.
हेही वाचा…“काय चाललंय महाराष्ट्रात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,”? नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
पुढे बोलतांना ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करू. पदाची अपेक्षा न ठेवता समर्पणाने काम करा. कर्नाटकच्या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. तिथे २८ पैकी २५ जागा आपण जिंकू, महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न नाही, एकच पॅटर्न फक्त मोदी पॅटर्न. पुढचे १२ महिने आपल्यासाठी महत्वाचे असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा…रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा गौप्यस्फोट, अभिजीत पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे विधान
जे म्हणतायत कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, त्यांना सांगेन हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शिवरायांनी एकेक मावळा तयार केलाय. त्याला देव-देश-धर्मासाठी कसं लढायचं हे माहिती आहे. पुढचं एक वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुणीही काहीही मागायचं नाही. कुणी कोणतं पद मागायचं नाही, समिती मागायची नाही, मंत्रीपद मागायचं नाही. पक्षानं मला काय दिलं? यापेक्षा मी पक्षाला काय दिलं? या भावनेतून सगळ्यांनी काम करायला हवं. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटक पॅटर्न नाही तर महाराष्ट्रात फक्त ‘मोदी पॅटर्न’ लागू होईल,” फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुम्ही कपडे बदलतात तसे पक्ष बदलत आहात,” पुण्यात नितेश राणेंची पत्रकारानी इज्जतच काढली..! “राणेंची चुप्पी
हेही वाचा…“..तर त्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसचे सेनापती झाले असते”
हेही वाचा…“…त्यामुळे नार्वेकर हेच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवू शकतात,” सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान ?
हेही वाचा…३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दानवेंचं फडणवीसांना पत्र