मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील १६ अपात्र आमदारांचा निकाल कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यातच शिंदे गटाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रतोदपदही कोर्टाने बेकायदेशीर ठरवलं आहे. यातच राज्यपालांनी दरम्यानच्या काळात घेतलेल्या भूमिकेवरही कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. यातच आता १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना केलेल्या कायद्याला यश,” बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी उठवली, फडणवीसांची प्रतिक्रिया
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भाजपच्या बाजूने असून ते शिंदे गटाला पूरक असाच निर्णय घेतील, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. “एबीपी माझाने” याबद्दलचे वृत्त दिलं आहे.
हेही वाचा…“राज्यात पुन्हा ‘भिररर’ चा थरार रंगणार, कोर्टाने ‘बैलगाडा’ शर्यतीवरील बंदी उठवली”
राहुल नार्वेकर हे जेव्हा अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसतात, तेव्हा ते निरपेक्ष असतात. त्यांचा निर्णय शिंदे गटाच्या बाजुने निर्णय येईल, किंवा ठाकरे गटाच्या बाजुने निर्णय देतील, असं म्हणणं आता चुकीचं आहे, असे मत सिद्धार्थ शिंदे यांनी वक्त केलं आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचे मुंबईत ‘सहा’ शिलेदार ठरले, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मोठी रणनीती
नार्वेकर यांना निर्णय देताना परिशिष्ट १० मधील नियमांचं पालन करा, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे नार्वेकर हेच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवू शकतात आणि तसं ते करतील, असेही वकील शिंदे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दानवेंचं फडणवीसांना पत्र
हेही वाचा…“काय चाललंय महाराष्ट्रात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,”? नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
हेही वाचा…रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा गौप्यस्फोट, अभिजीत पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे विधान
हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीकरीता ‘नवनीत राणां’च्या विरोधात ठाकरेंची रणनीती, ‘फायर ब्रॅंन्ड’ नेत्याच्या नावाची चर्चा
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित ! भाजपआमदार महेश लांडगे यांच्या भावना