पुणे : राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसापासून चांगलचं गरम झालं आहे. यातच खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे सातत्याने टिका करतांना दिसत आहेत. यातच आज भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात होत आहे. यावेळी पुण्यातील एका पत्रकारांनी नितेश राणेंवर प्रश्नांची सरबत्तीची चढविल्याने नितेश राणेंनी उत्तर देण्याचं टाळल्याचं दिसून आलं.
हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीकरीता ‘नवनीत राणां’च्या विरोधात ठाकरेंची रणनीती, ‘फायर ब्रॅंन्ड’ नेत्याच्या नावाची चर्चा
भाजपची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक पुण्यातील बालगंधर्व याठिकाणी होत आहे. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थितीत झाले आहेत. यावेळी नितेश राणेंना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांची बोलती बंद झाल्याचं दिसून आलं.
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित ! भाजपआमदार महेश लांडगे यांच्या भावना
पत्रकारांनी प्रश्न केला की, नितेश राणे तुम्ही मुंबईच्या पत्रकारांना रोज भेटतात. तसं आम्हाला तुम्ही भेटत नाही. आम्हाला सर्वांना एक कुतूहूल आहे की, तुम्ही कपडे बदलता, तसे पक्ष बदलतात. तुम्ही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला एकेकाळी तुम्ही हाफ चड्डी म्हणून म्हटलं होतं. तर आजची विचारधारा तुमची काय आहे. तसंच आजच्या बालगंधर्व रंगमंदिरात तुम्ही गडकरींचा पुतळा उखडून टाकल्यानंतरची भूमिका काय आहे. असं नितेश राणेंना विचारण्यात आलं.
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना केलेल्या कायद्याला यश,” बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी उठवली, फडणवीसांची प्रतिक्रिया
त्यावर नितेश राणे यांनी उत्तर देतांना म्हणाले की, जी भूमिका आम्हाला पटते. ती भूमिका आम्ही स्विकारतो. कपडे बदलतो, तसा पक्ष बदलतो. तुमची इच्छा असेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊन तुमची टीआरपी वाढवेल. तुम्ही मला नंतर कधीतरी नंतर बोला. असं म्हणत नितेश राणे यांनी त्या प्रश्नांवर उत्तर देण्याचं टाळलं.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर त्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसचे सेनापती झाले असते”
हेही वाचा…“…त्यामुळे नार्वेकर हेच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवू शकतात,” सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान ?
हेही वाचा…३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दानवेंचं फडणवीसांना पत्र
हेही वाचा…“काय चाललंय महाराष्ट्रात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,”? नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
हेही वाचा…रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा गौप्यस्फोट, अभिजीत पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे विधान