पुणे : कर्नाटकच्या विधानसभेत ७०० पेक्षा कमी पडलेल्या उमेदवारांची संख्या पाच आहेत. त्यात ४६ जागा ह्या दोन हजार ते तीन हजार मतांचा फरक आहे. बुथ सशक्तीकरणाच्या माध्यमातून सगळे जरी एकत्र झालेत. तरी महाराष्ट्रात चांगला विजय मिळवू शकतो. त्यामुळे बुथकडे सर्वोत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील कडाडून टिका केली.
हेही वाचा…रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा गौप्यस्फोट, अभिजीत पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे विधान
कर्नाटकात पराजय झाल्यानंतर काही जणांना इतक्या आनंदाच्या उकाळ्या फुटायला लागल्या की, ज्यांच्या घरी पोरगाच फैदा झाला नाही. तेही असे नाचत आहेत. अस म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला हाणला. तसेच कर्नाटकच्या पराजयाची चर्चा होते, तर दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशात भाजपचाच रेकॉर्ड मोडला आहे. अन् सतरा महापौरच्या निवडणुकीत निवडून आले. तसेच सगळ्या नगरपालिकेत भाजपचा विजय झाला. परंतु त्याची चर्चा झाली नाही. असंही फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीकरीता ‘नवनीत राणां’च्या विरोधात ठाकरेंची रणनीती, ‘फायर ब्रॅंन्ड’ नेत्याच्या नावाची चर्चा
तसेच त्यांचा कर्नाटक पॅटर्न लोकसभेच्या निवडणुकीच लक्षात येईल. या निवडणुकीत ४८ जागांपैकी २५ जागा आपण निवडून येऊ. त्यामुळे महाविकास आघाडीने काहीही केलं तरी महाराष्ट्रात मोदी पॅटर्न लागू होईल. असंही फडणवीसांनी म्हटलं. आज पुण्यात बालगंधर्व येथे भाजपची राज्य कारिणी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
READ ALSO :
हेही वाचा…“तुम्ही कपडे बदलतात तसे पक्ष बदलत आहात,” पुण्यात नितेश राणेंची पत्रकारानी इज्जतच काढली..! “राणेंची चुप्पी
हेही वाचा…“..तर त्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसचे सेनापती झाले असते”
हेही वाचा…“…त्यामुळे नार्वेकर हेच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवू शकतात,” सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान ?
हेही वाचा…३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दानवेंचं फडणवीसांना पत्र
हेही वाचा…“काय चाललंय महाराष्ट्रात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,”? नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात