नागपूर: नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. सतत्याच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
हे पण वाचा: “…तर बॉलिवूडच्या ‘क्वीन’ला होऊ शकते अटक”, न्यायालायने दिली होती अखेरची संधी
नागपुरातील कोरोना संसर्गाचे लक्षणीयरित्या कमी झालेले प्रमाण, विविध छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती, वाढत असलेला रोष पाहता नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/CP9tuEQBOy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 27, 2021
नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. सातत्याच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
हे पण वाचा: आठवडा उलटून गेला…पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी? अजित पवारांनी केले भाष्य
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बर्याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल.
हे पण वाचा: कोल्हापुरात अत्यावश्यक सेवा सोडून इतर वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय
नागपुरातील कोरोनाच्या गेल्या १० दिवसांतील स्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. १७ ते २७ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत नागपुरात एकूण झालेल्या चाचण्या ५९,९४८ इतक्या आहेत, तर त्यात कोरोना संसर्ग आढळून आलेले रूग्ण ५८इतके आहेत. हे प्रमाण ०.१० टक्के इतके आहे. त्यामुळे आता नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे.
Read Also :
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी
- ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’, राऊतांच्या टिकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर
- कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज, ६ जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
- कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी