मुंबई : बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात, न्यायालयासमोर हजर होण्यासाठी अंधेरीतील महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंगनाला शेवटची संधी दिली आहे. या पुढच्या सुनावणीला कंगना न्यायालयात उपस्थिती राहिली नाही, तर तिच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट बजावणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.
कोल्हापुरात अत्यावश्यक सेवा सोडून इतर वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय
“सध्या कंगना परदेशात आहे. ती २७ जुलैला होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकत नाही,” असे कंगनाच्यावतीने तिच्या वकिलाने सांगितले आहे. तसेच, न्यायालयात व्यक्तीगत हजर राहण्यापासून तिने वकिलातर्फे सवलत मागितली होती. या मागणीला जावेद अख्तर यांच्या वकिलाने विरोध केला असून, याआधी कंगना एकाही तारखेला सुनावणीसाठी हजर राहिलेली नाही, त्यामुळे तिच्याविरोधात वॉरंट काढण्यात यावे, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली आहे.
आठवडा उलटून गेला…पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी? अजित पवारांनी केले भाष्य
दरम्यान, न्यायालयात आता दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आणि महामारी काळात SOP असल्यामुळे, अंधेरीचे महानगर दंडाधिकारी आर.आर.खान यांनी, पुढच्या सुनावणीला कंगनाला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत आणि तरीही ती गैरहजर राहिली, तर तिच्याविरोधात वॉरंट बजावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
“जावेद अख्तर, बॉलिवूडच्या ‘सुसाईड गँग’चा एक भाग आहेत,” असं वक्तव्य एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने केले होते. सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असताना, तिने हे विधान केले होते. तिची ही वक्तव्ये आयपीसीच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत बदनामीकारक असून, ती गुन्हा ठरतात, असा जावेद अख्तर यांचा दावा आहे. त्यामुळे, तिच्या विरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात जावेद अखतर यांनी याचिका दाखल केली आहे.
Read Also :
- “पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
- “पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर
- पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
- “देशाला संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आणि त्यांचं नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावरचं”
- “या परिस्थितीत महाराष्ट्रात आलात तर…”, संजय राऊतांनी केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना दिले आव्हान!