मुंबई: कोकणातील चित्र विदारक आहे, अशा परिस्थितीत मदत देताना कोणतेही राजकारण केले जाणार नाही. केंद्राकडून नक्की मदत मिळेल. केंद्र आणि राज्य सरकार एकजुटीने मिळून या गावांचे योग्य ते पुनर्वसन करतील, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. महापुराच्या संकटात राज्य सरकारची कामगिरी उत्तम आहे आणि प्रशासनही चांगले काम करीत आहे, अशी कौतुकाची थापही राज्यपालांनी दिली.
हे पण वाचा: पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी महाड आणि चिपळूणचा दौरा केला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल रायगड आणि रत्नागिरी जिह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. तळियेची दुर्घटना वेदनादायी आहे. संपूर्ण गाव आणि कुटुंबे नष्ट होणे हे दुर्दैवी आहे. त्यांना मदत देतानाच कोणतेही राजकारण केले जाणार नाही. पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे, मुख्यमंत्रीही येथे भेट देऊन गेले आहेत. पुढील काळात केंद्र आणि राज्य सरकार मिळून दरडग्रस्त गावांचे सुयोग्य पद्धतीने पुनर्वसन करतील. त्यासाठी सर्वांचेच सहकार्य आहे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
हे पण वाचा: “पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर
गृह मंत्रालयाने ७०० कोटीं मंजूर:
राज्य सरकार आणि केंद्रीय सरकारने पुरात नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदतीचा हाथ पुढे केला आहे. “आम्हाला नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने ७०० कोटीं रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे, ” असे तोमर म्हणाले आहेत.
हे पण वाचा: “पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
उपचाराचा खर्च सरकारकडून
पुरात ज्यांनी आपला जीव गमावला, त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ५ लाखांची मदत करणार आहेत. जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. राज्यात दिवसभर दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळांचा आढावा घेतला आहे. बचाव कार्य सुरु झालं असून लोकांची सुटका करण्यात येत आहे.
Read Also :
- ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’, राऊतांच्या टिकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर
- कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज, ६ जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
- कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
- “पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
- “पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर