मुंबई : शरद पवार हे आमचा आधार आणि दैवत आहेत. पण भाजपचा आधार घेणं किंवा बरोबर जाणं ही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष म्हणून घेतलेली भूमिका आहे. ५ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. असं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली. ? ईडी, सीबीआयच्या नोटीसांमुळे भाजपाबरोबर गेलात का ? यावर मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील,” पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..
इडी इन्कम टॅक्सच्या नोटीसा आज नाही तर, गेल्या अनेक वर्षापासून आल्या आहेत. मात्र, याच्या भीतीने आम्ही भाजपबरोबर गेलो, हे लोकांमध्ये पसरवलं जातं. राष्ट्रवादीच्या उभारणीत स्वाभीमान हा विषय होता. हा पक्ष लोकशाही मानणार आहे. आमच्यासाठी दैवत आणि आधारस्तंभ शरद पवारच आहेत. लोकप्रतिनिधींची कामे आणि मतदारसंघाचा विकास होणे याला आमदार म्हणून आम्ही उत्तरदायीत्व असल्याचंही मुंडे म्हणाले.
हेही वाचा…राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा फॉर्म्युला ठरला, भाजपला ६ तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ३ जागा
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडण्याचा निर्णय मी घेतला नाही. ११ जानेवारी २०१२ साली गोपीनाथ मुंडे यांनी भूमिका घेतली की, माझ्या वडिलांचा आणि माझा त्यांच्याशी, कुटुंबाशी आणि भाजपाशी काहीही संबंध नाहीत. मग मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटलो. त्यानंतर मी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेता. मला आणि माझ्या वडिलांना बाजूला करण्यात, आम्ही लायक होतो की नालायक या गोष्टी कारणीभूत होत्या. पण अनेक वर्ष माझ्या वडिलांनी कष्ट घेतले वयाने मोठे असले तरी नेतृत्व आणि कर्तृत्वामुळे गोपीनाथ मुंडेंसमोर माझे वडील झुकायचे असंही त्यांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”
हेही वाचा…“भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा”, शरद पोंक्षेंवर सुषमा अंधारे भडकल्या
हेही वाचा…“संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? तात्काळ तुरूंगात टाका”, यशोमती ठाकूर आक्रमक
हेही वाचा…सरकारचा निष्काळजीपणा..! तर इर्शाळवाडी दुर्घटना वाचली असती, २०१५ सालीच पत्र दिलं होतं, पण…
हेही वाचा…“आमदार अन् जिल्ह्याध्यक्षांना दिलं टार्गेट, कागदपत्र जुळवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार हालचाली”