मुंबई : महात्मा गांधी यांच्याबाबत शिवप्रतिष्ठान संघटनेचे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काॅंग्रेसचे नेते आज चांगलेच आक्रमक बघायला मिळाले. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा अन् त्यांना तुरूंगात टाका अशी मागणी देखील काॅंग्रेसच्या नेत्यांनी केली. तर काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा…“येत्या निवडणुकीपर्यंत शिल्लक सेना ही ठाकरेंच्या सोबत राहणार नाही”, बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार
संभाजी भिडे कायम वाट्टेल ते बरळतात, इतिहासाची तोडफोड करून दोन समाजात तेढ निर्माण करतात. युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात. मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, त्यांना पुर्णपणे मुभा देते. संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? आणि त्यांना अभय कुणाचे ? असा प्रश्न देखील यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी. भिडेंची समाजप्रबोधन करण्याची पात्रता नाही. भिंडेची जागा कारागृहात आहे. दंगली पेटविण्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य करून राष्टपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या भिडेंवर कठोर कारवाई करा. असही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“तेव्हा भाजपसोबत कसं बसायचं म्हणून राजीनामे दिले होते अन् आता,” ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
दरम्यान, महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज काॅंग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर बाळासाहेब थोरातांनी देखील राज्य सरकारला याबाबत कारवाई करण्यास सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…सरकारचा निष्काळजीपणा..! तर इर्शाळवाडी दुर्घटना वाचली असती, २०१५ सालीच पत्र दिलं होतं, पण…
हेही वाचा…“आमदार अन् जिल्ह्याध्यक्षांना दिलं टार्गेट, कागदपत्र जुळवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार हालचाली”
हेही वाचा…“अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील,” पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा फॉर्म्युला ठरला, भाजपला ६ तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ३ जागा
हेही वाचा…“स्मृती इराणींचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा”,यशोमती ठाकूरांचा जोरदार टोला