मुंबई : गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून अनेक माणसं ढिगाऱ्याखाली सापडली. यामध्ये आतापर्यंत २७ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातील नेते इर्शाळवाडीत पोहचले. दुर्घटनाग्रस्त लोकांना शासनाकडून मदतही देण्यात आली. यातच या घटनेवरून मनसेने एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“तेव्हा भाजपसोबत कसं बसायचं म्हणून राजीनामे दिले होते अन् आता,” ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
धक्कादायक असं म्हणत २५ जून २०१५ साली इर्शाळवाडी ग्रामस्थांनी रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवलं होतं की, माळीण गावासारखे संकट आमच्यावरही कोसळू शकतं. त्यामुळे आमच्या वाडीचं चौक सर्व्हे क्रं. २४ येथे पुनर्वसन करा. २०१५ साली किंवा त्यांनंतर ह्या पत्राची दखल घेतली गेली असती तर आज शेकडो प्राण वाचले असते आणि ग्रामस्थ सुरक्षित नांदले असते. शासन-प्रशासनांनी तात्परता आणि संवेदनशीलता दाखवली नाही तर समाजाला केवढी मोठी किंमत चुकवावी लागते त्याचं हे जीवघेणं उदाहरण असं मनसेने ट्विट केलं आहे.
हेही वाचा…शिवसेनासारखी राष्ट्रवादीचीही राजकीय लढाई सुरू झाली, शरद पवार गटाला आयोगाची नोटीस
दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर देखील ताशोरे ओढले. त्यांनी याची पुर्वसुचना दिली होती. मात्र सरकारने याकडे दुलर्क्ष केल्याने ही परिस्थिती ओढावली असल्याचं सांगण्यात येत आहे.
#धक्कादायक ! २५ जून २०१५ साली ईरशाळवाडी ग्रामस्थांनी रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवलं होतं कि, ‘माळीण गावासारखे संकट आमच्यावरही कोसळू शकतं त्यामुळे आमच्या वाडीचं चौक सर्व्हे क्र. २४ येथे पुनर्वसन करा.’
२०१५ साली किंवा त्यानंतर ह्या पत्राची दखल घेतली गेली असती तर आज… pic.twitter.com/1IDIw1rNhp
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आमदार अन् जिल्ह्याध्यक्षांना दिलं टार्गेट, कागदपत्र जुळवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार हालचाली”
हेही वाचा…“अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील,” पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा फॉर्म्युला ठरला, भाजपला ६ तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ३ जागा
हेही वाचा…“स्मृती इराणींचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा”,यशोमती ठाकूरांचा जोरदार टोला
हेही वाचा…“येत्या निवडणुकीपर्यंत शिल्लक सेना ही ठाकरेंच्या सोबत राहणार नाही”, बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार