मुंबई : उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदी यांच्या नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा उद्धव ठाकरे यांना अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण २०१९ च्या निवडणुकीत मोदी यांच्या कर्तृत्वावर शेकडो भाषणं केलीत आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
हेही वाचा…“शिरीष कणेकरांच्या दु : खद निधनाची बातमी पचविणे अवघड”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली या मुलाखतीतून ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. महायुतीच्या जागा वाटपाची चिंता करू नका. उद्धव ठाकरे यांची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का ? त्याकडेही लक्ष द्या, असा टोला देखील त्यांनी लगावला.
हेही वाचा…“खेकड्यांना सांभाळलं असतं तर…” उद्धव ठाकरेंच्या टिकेवर गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी ५ दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण २०२४ साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसवण्याचं काम देणार आहे. ३० वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते आज मुंबईची चिंता करीत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 27, 2023
READ ALSO :
न“तेव्हा भाजपसोबत कसं बसायचं म्हणून राजीनामे दिले होते अन् आता,” ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
हेही वाचा…शिवसेनासारखी राष्ट्रवादीचीही राजकीय लढाई सुरू झाली, शरद पवार गटाला आयोगाची नोटीस
हेही वाचा…“मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर..,”बावनकुळेंची ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…ठाकरेंना मोठा झटका…! तब्बल सात वेळा राहिलेल्या ‘या’ नगरसेविकानी शिंदे गटात केला प्रवेश
हेही वाचा…“२०२४ मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, त्यावेळी आमचे ४५ पेक्षा जास्त खासदार असतील”,- बावनकुळे