मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी छेडलेल्या आंदोलनाबाबत सरकारने निमंत्रित केलेल्या चर्चेसाठी स्वतः न जात मराठा समाजाच्या समन्वयकांना पाठवलं होतं. यानंतर दुपारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टमंडळाने आंदोलन स्थळी जाऊन छत्रपती संभाजी राजेंची भेट घेतली आणि त्यांच्या मुख्य पाच मागण्यांची पूर्तता केलेले कागदपत्र त्यांना दाखवले.
मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्या हातात जे आहे ते करू, मात्र…
त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी आपण उपोषण सोडत असल्याची घोषणा केली होती. यानंतर मराठा समाजामध्ये देखील चांगलाच जल्लोष बघायला मिळाला. दुसरीकडे सरकारने केलेल्या विलंबनावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
संयम संपला: संध्याकाळ पर्यंत पत्र आलं नाही तर…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या होत्या. तसं असतानाही या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत शरमेची बाब आहे. आतातरी महाविकास आघाडी सरकार या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसेच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करणार नाही अशी आशा आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दोन विमाने आले म्हणजे सगळे विद्यार्थी आले असं होत नाही; विजयी वडेट्टीवारांचा केंद्र सरकारला टोला
भारतीय जनता पक्षाने नेहमीच मराठा समाजाच्या मागण्यासाठी आपला पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडी छत्रपती संभाजी राजे यांनी छेडलेल्या उपोषणाला टाळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही किंवा त्याची ताबडतोब दखलही घेतली नाही. मराठा समाजाचे जे हक्काचे आहे व जे सरकारला सहज करता आले असते त्यासाठीही शाहू महाराजांच्या वंशजाला राज्याच्या राजधानीत प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अश्या शब्दात चंद्रकांत दादा पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
Read also:
- मराठा समाजाच्या प्रमुख पाच मागण्या सरकार पूर्ण करणार; संभाजीराजेंच्या कोणत्या मागण्या होत्या…
- नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी; त्या आधी समोर आली माहिती
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यांवर इडीची कारवाई; तब्बल 13 कोटी 41 लाख मालमत्ता जप्त
- नंदुरबारमध्ये दाऊद इब्राहिमच्या पुतळ्याचे दहन करत ठाकरे सरकारचा नोंदवला निषेध
- वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका