मुंबई : कर्नाटक मधील काॅंग्रेस सरकारला जे करता आले ते महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना का करता आले नाही ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी केंद्राकडून निधी आणण्यात राज्य सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा झाला आहे. दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळवा”, एकनाथ खडसेंनी कोणती केली मागणी ?
मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग असल्याने प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा…अखेर मराठा आंदोलकांनी नमतं घेतलं, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कुणाला ?
राज्य सरकारच्या ह्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे राज्याला चार ते पाच हजार कोटींचा भुर्दंड बसणार आहे. केंद्राकडून येणारी मदत आता राज्याला मिळणार नाही. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे निधी मिळणे अवघड आहे. शेजारच्या कर्नाटक राज्याने दुष्काळ निवारणाचे सर्व काटेकोर नियोजन करून केंद्र सरकाला निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. जर कर्नाटकला हे जमत असेल तर महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काय करत आहेत? असा सवालही वडेट्टीवार यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“तर तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो”, जरांगे पाटलांचं अजित पवारांना खास आवाहन
हेही वाचा…शरद पवारांनी उभी केली महिलांची मोठी फौज, राष्ट्रवादीत अनेक महिलांना लागली लॉटरी
हेही वाचा…“चुकीला माफी नाही”, बागेश्वर बाबा संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत दाखल
हेही वाचा…मोठी बातमी..! ससूनमधून पळून जाण्यास ललित पाटीलला पोलिसांची मदत, धागेदोरे अजून कुठपर्यंत ?
हेही वाचा…राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री, ‘या’ माजी मंत्र्यांचा करणार प्रचार