मुंबई : आरक्षण प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापू लागल्यानंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबाबत जपून बोलण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांना खास आवाहन केलं आहे.
हेही वाचा…अखेर मराठा आंदोलकांनी नमतं घेतलं, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कुणाला ?
आमदार आणि मंत्र्यांना भूमिका मांडताना काळजी घेण्याची तंबी दिली आहे. तर आता आरक्षणाचीही तंबी देऊन टाका. लगेच आरक्षण दिलं तर मी नाशिकमधूनच घरी जातो आणि तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो. मराठ्यांची लाखो पोरंही आणतो. आणखी काय सन्मान पाहिजे तुम्हाला ? असा खोचक टोला मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांना लगावला आहे.
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा प्रशासनाला अल्टिमेटम, मराठा आंदोलक अन् प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न
दरम्यान, मराठा कुणबी नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २३ लाख कागदपत्रे तपासली गेली आहेत. आतापर्यंत १ लाख ३१ हजार जणांच्या कुणबी नोंदी तपासल्या गेल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र संकेत स्थळावर अपलोड करायला सुरूवातही झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांनी उभी केली महिलांची मोठी फौज, राष्ट्रवादीत अनेक महिलांना लागली लॉटरी
हेही वाचा…“चुकीला माफी नाही”, बागेश्वर बाबा संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत दाखल
हेही वाचा…मोठी बातमी..! ससूनमधून पळून जाण्यास ललित पाटीलला पोलिसांची मदत, धागेदोरे अजून कुठपर्यंत ?
हेही वाचा…राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री, ‘या’ माजी मंत्र्यांचा करणार प्रचार
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळवा”, एकनाथ खडसेंनी कोणती केली मागणी ?