पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर धाड पडली आहे. इडीच्या अधिकाऱ्यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या सहा ठिकाणांवर धाड मारली आहे. पुणे, बारामतीसह संभाजीनगरातील कार्यालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रोहित पवार परदेशात असताना ही धाड मारण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हेही वाचा…जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर या कंपन्यांच्या सहा ठिकाणच्या कार्यालयावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आलीय. सकाळी ८ वाजता ही छापेमारी करण्यात आली असून सात झाले तरी अजूनही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीत झाडाझडती सुरू आहे.पुणे बारामती, पिंपरी संभाजीनगरसहीत सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आलीय. महाराष्ट्र शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केल्याने एकच खळबळ उडालीय. रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत. त्यांचं बारामती आणि हडपसर येथे कार्यालय आहे.
हेही वाचा…“तर गृहमंत्र्यांनी ‘या’ महाशयांवर कठोर कारवाई करा,” रूपाली चाकणकरांची आव्हाडांवर खोचक टिका
दरम्यान. बारामती अॅग्रो कंपंनीवर धाड टाकल्यानंतर रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी राज्यातील महापुरूषांचा फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल.
यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे. वाईट याचेच वाटते की,यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत.परंतु मला विश्वास आहे की,रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही,उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल. असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या #महाराष्ट्र_धर्म जपला आणि वाढवला…
अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने… pic.twitter.com/eBMxFe9Sj4— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा…प्रख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यातील कोथरूडमध्ये एकामागून तीन झाडल्या गोळ्या
हेही वाचा…महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच ; नाशकात भाजप अन् अजित पवार गटात ‘बॅनरवॉर’
हेही वाचा..भावना गवळींच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, लोकसभेची तगडी लढत होणार
हेही वाचा…पुण्यात पुन्हा लागले ‘या’ नेत्याचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा..आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, वरळीतील माजी नरसेविकाचा शिंदे गटात प्रवेश