मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील अपक्ष आमदार बच्चू कडू सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यातच आज बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला अनेक फोन केलेत. त्यांनी मला १७ तारखेला भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे आता त्यांना भेटून आपली पुढची भूमिका मांडणार. परंतु घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मतदारसंघात जाऊन उत्तर देणार,” रोहित पवारांचा दिलीप वळसे-पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला राज्यमंंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये सहभागी झालो. त्यानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण जुळले, त्यावेळी मला दिव्यांग मंत्रालय देण्यात यावे, अशी अट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घातली होती. त्यांनतर गुवाहाटी गेलो अन् मला दिव्यांग मंत्रालय दिलं. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी मला आयुष्यभर ऋणी राहील, व त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी व्यक्तिगत पदासाठी मी त्यांचा सदैव गुलाम म्हणून काम करत राहिन असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मंत्रिमंडळाचा तिढा दिल्ली दरबारी, अजित पवार अमित शहांच्या भेटीला, शिंदे-फडणवीसही जाणार
याचसोबत देवेंद्र फडणवीस यांनी वीर चक्र प्राप्त सैनिकांना तिरंग्यात घेऊन येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांचे देखील आभार मानत आहेत. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं. एकंदरीत सत्ता आणि पैसा आणि पुन्हा सत्ता हे जे काही समीकरण बदललं आहे. यालाही आम्हाला कंटाळा आला आहे. लोकं आम्हाला याविषयी विचारत आहेत. यातच मंत्रिपदासाठी असलेला दावा सोडणार होतो, परंतु मुख्यमंत्र्यांनी मला फोन आला. अन् त्यांनी मला १७ तारखेला भेटायला बोलावलं आहे. त्यानंतर माझा निर्णय जाहीर करणार असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रात्रीचा प्रवास, मुक्काम करा, पण…,” लोकसभेच्या ‘त्या’ १६० भाजपचा मेगा प्लॅन तयार
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवार गटाला अर्थमंत्री अन् मंत्री पद नाही तर ‘या’ कारणामुळे रखडला मंत्रिमंडळाचा विस्तार
हेही वाचा…अब्दुल सत्तारांवर खटला चालणार, ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंची पंचाईत
हेही वाचा…आदिती तटकरेंवर केलेल्या टिकेवर अजित पवार गटाकडून प्रथमच शिंदे गटावर टिका, राजकारण तापलं
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतून दिलं टार्गेट, “लोकसभा निवडणुकीसाठी काहीही करा पण..”