मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा…“ .त्यावेळी मी मृत्यूची वाट पाहत होते…,” निलम गोऱ्हे हुंदका देत व्यक्त झाल्या
एकच जमीन जी 2014 रोजी खरेदी केली, त्याच्या किमतीमध्ये 2019 ला अधिकची किंमत दाखवण्यात आली आहे.अशाच एकूण 4 ते 5 मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचं न्यायालयाच्या तपासात आढळून आलं आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयानं याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी 2021मध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“आपल्या घाशातील घास खाणारी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली”, बच्चू कडूंची पुन्हा नाराजी
दरम्यान, मागील काही वर्षापासून शिंदे सरकारमधील शिवसेनेचे नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यातच काही दिवसापासून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणि घोटाळ्यात अडचणीत आणल्यामुळे शिंदे सरकारवर नामुष्की ओढावली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आदिती तटकरेंवर केलेल्या टिकेवर अजित पवार गटाकडून प्रथमच शिंदे गटावर टिका, राजकारण तापलं
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतून दिलं टार्गेट, “लोकसभा निवडणुकीसाठी काहीही करा पण..”
हेही वाचा…“मतदारसंघात जाऊन उत्तर देणार,” रोहित पवारांचा दिलीप वळसे-पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मंत्रिमंडळाचा तिढा दिल्ली दरबारी, अजित पवार अमित शहांच्या भेटीला, शिंदे-फडणवीसही जाणार
हेही वाचा…गोगवालेंना ‘ते’ वाक्य भोवलं, रोहित पवारांसह आख्खी राष्ट्रवादी आदिती तटकरेंच्या पाठिंशी