नवी दिल्ली : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यासाठी आता बैठकांचा धडका देखील सुरू करण्यात आला आहे. यातच दिल्लीत राज्यातील सगळ्याच काॅंग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील प्रमुख नेत्यांसह राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी दिल्लीतून काॅंग्रेसच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीबाबत टार्गेट दिले असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा…मंत्रीमंडळ विस्तार : पुण्यातून आमदार मिसाळ यांना ‘कॉल’ अन् पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांची ‘विकेट’?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातून किमान १५ ते २० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, अशी सूचना काॅंग्रेसच्या पक्षनेतृत्वाने राज्यातील नेत्यांना कालच्या बैठकीत केली आहे. राज्यातील काॅंग्रेस नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काॅंग्रेस नेते राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, खासदार रजनी पाटील, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार सुनिल केदार आधी सुमारे २५ नेते उपस्थित होते.
हेही वाचा…“इतक्या कलंकित गोष्टी करून सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर”
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सामील झाल्याने राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. यातच आता राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत निवडणुकीत दिसणार असून या निवडणुकांकडे आता सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मतदारसंघात जाऊन उत्तर देणार,” रोहित पवारांचा दिलीप वळसे-पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मंत्रिमंडळाचा तिढा दिल्ली दरबारी, अजित पवार अमित शहांच्या भेटीला, शिंदे-फडणवीसही जाणार
हेही वाचा…गोगवालेंना ‘ते’ वाक्य भोवलं, रोहित पवारांसह आख्खी राष्ट्रवादी आदिती तटकरेंच्या पाठिंशी
हेही वाचा…“ .त्यावेळी मी मृत्यूची वाट पाहत होते…,” निलम गोऱ्हे हुंदका देत व्यक्त झाल्या
हेही वाचा…“आपल्या घाशातील घास खाणारी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली”, बच्चू कडूंची पुन्हा नाराजी