पुणे । विशेष प्रतिनिधी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग आला असून, दोन दिवसांत मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे निश्चित मानले जाते. विशेष म्हणजे, पुण्यातील पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांना ‘कॉल’ आला असून, मुंबईत दाखल झाल्या आहेत, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ‘पालकमंत्रीपद’ धोक्यात असून, त्या ठिकाणी सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला आहे. त्यामुळे पाटील यांच्या पुण्यातील वर्चस्वाला धक्का बसण्याची मोठी शक्यता आहे.
हेही वाचा…“..म्हणून माझ्या रक्ताने तु्म्हाला पत्र लिहीत आहे,” तरूणांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतीय जनता पार्टीच्या ‘निष्ठावंत’ नेत्या म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीची सत्ता असताना मिसाळ यांनी भाजपाची पताका अभिमानाने खांद्यावर मिरवली आहे. पर्वती मतदार संघात भाजपाचे वर्चस्व राखण्यात त्यांना यश मिळाले आहे. पुण्यातील भाजपाला ताकद देण्यासाठी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासोबत मिसाळ यांनी पक्ष संघटनेचे काम सक्षमपणे केले आहे. त्याची दखल घेत भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुण्यातून मिसाळ यांच्या नावाला पसंती दिली आहे.
हेही वाचा…तृतीय पंथीय समाज नितेश राणेंना कोर्टात खेचणार, ठाकरेंवरील टिका नितेश राणेंना भोवली
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत कुरबुरी वाढल्या होत्या. पुण्यातील भाजपाचा प्रभाव वाढवण्यासाठी सक्षम चेहऱ्याला संधी द्यावी, अशी सूचना भाजपा परिवारातील काही दिग्गजांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्या अनुशंगाने, आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदावर दावा केल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना ‘त्याग’ करावा लगणार आहे.
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू, नव्या आमदारांना संधी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दोन महिन्यांपूर्वी पुण्यात कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी, आमदार, खासदारांनी पक्ष विस्तारासाठी ‘त्याग’ करण्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे पुण्यातून चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रीपदाचा त्याग करावा लागेल, असे चित्र दिसत आहे.
दरम्यान, मुंबई विधानभवन आणि राजभवन परिसरात हालचालींना वेग आला असून, दिल्लीतून आदेश मिळताच मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडेल, असे संकेत आहेत. निवडक लोकांना मुंबईत दाखल होण्याच्या सूचना मिळाल्यामुळे इच्छुकांनीही ‘देव पाण्यात ठेवले’ आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“इतक्या कलंकित गोष्टी करून सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर”
हेही वाचा…पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रीपद, आजच होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?
हेही वाचा…रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे-राष्ट्रवादीत वादाची पहिली ठिणगी, राजकारण तापणार
हेही वाचा…“कुठंही दिसला तरी तुझ्या तोंडाला काळं फासणार,” नितेश राणेंच्या विरोधात तृतीय पंथीय समाज आक्रमक
हेही वाचा…“एसटी कर्मचाऱ्यांच्या १२३ आत्महत्यांना शरद पवार जबाबदार”, गुणरत्ने सदावर्तेंची शरद पवारांवर टिका