मुंबई : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव द्यायचे होते. तेव्हा पवार मुख्यमंत्री होते. कोणत्याही नेत्यांनी विरोध केला नव्हता तरीही आम्हाला ३० वर्षे झुलवत ठेवले. अजूनही नामांतर झाले नाही. शरद पवार फक्त राजकीय पोळी भाजून घेतात. लोकांना झुलवतात. अशी प्रखर टिका निलंबित वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.
हेही वाचा…अजित पवार यांच्याकडील अर्थखातं बरोबर राष्ट्रवादीला मिळणार ‘ही’ खाती
एसटी कर्मचाऱ्यांच्या १२३ आत्महत्यांना पवार जबाबदार आहेत. कोल्हापुरच्या सभेत त्यांनी एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे असे म्हटले होते. त्यांनी कामगारांचे आंदोलन पाडले. पवारांनीच कायम सत्तेसाठी जातदांडग्यांना गरिबांच्या विरोधात वापरले. त्यामुळे आमचा त्यांना विरोध असल्याचंही गुणरत्ने सदावर्तेंनी म्हटलं आहे. दरम्यान, मला कुटलीही लालसा नाही. असंही गुणरत्ने सदावर्तेंनी म्हटलंय.
हेही वाचा…“राष्ट्रवादीला १०० कोटी देत असतील तर आम्हाला २०० कोटी रूपये द्या,” मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाची तक्रार
दरम्यान, भारतीय संविधानातील कमल २२६ आणि ३२ ही ताकद आहे. आपण कायदे समजून घेणे गरजेचे आहे. मी प्रखर आंबेडकरवादी आहे. मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार आहे. मी सावरकर आणि गोडसेप्रेमी आहे. म्हणून मी जय श्रीरामचा नारा देतो. कम्युनिस्टांनी श्रमिकांसाठी ना चांगले कायदे केले ना त्यांना न्याय दिला. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणून माझ्या रक्ताने तु्म्हाला पत्र लिहीत आहे,” तरूणांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हेही वाचा…तृतीय पंथीय समाज नितेश राणेंना कोर्टात खेचणार, ठाकरेंवरील टिका नितेश राणेंना भोवली
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू, नव्या आमदारांना संधी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला”
हेही वाचा…काॅंग्रेसची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरली..! दिल्लीत काॅंग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय
हेही वाचा…अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादीने दिली जबाबदारी, अजित पवार गटाच्याविरोधात मोठी रणनीती