मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. तब्बल दोन तास ही बैठक चालली. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप या संदर्भात ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा…कामाला लागा..! सर्वात जास्त जागा निवडून येतील, काॅंग्रेसला महाराष्ट्राकडून अपेक्षा, वरिष्ठ नेत्यांचे आदेश
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज, बुधवारी सांयकाळी होण्याची शक्यता असून, त्यासाठीच्या हालचालींना मंगळवारी रात्री वेग आला होता. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांना डच्चू देण्याबरोबरच नव्या मंत्र्यांना शपथ देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते सुरू होती.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सध्या मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज”, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर त्याआधी एकनाथ शिंदे यांच्यासह १० तर भाजपचे १० असे एकूण २९ मंत्री सध्या सरकारमध्ये आहेत. त्यामुळे अजून १४ मंत्री पद रिक्त आहेत. या मंत्रिपदावर आता कुणाची वर्णी लागणार ते पाहणं महत्वाचं लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरली..! दिल्लीत काॅंग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय
हेही वाचा…अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादीने दिली जबाबदारी, अजित पवार गटाच्याविरोधात मोठी रणनीती
हेही वाचा…अजित पवार यांच्याकडील अर्थखातं बरोबर राष्ट्रवादीला मिळणार ‘ही’ खाती
हेही वाचा…“राष्ट्रवादीला १०० कोटी देत असतील तर आम्हाला २०० कोटी रूपये द्या,” मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाची तक्रार
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी तर उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा”,भाजप नेत्याची जहरी टिका