मुंबई : राज्यातील बहुतेक महानगरपालिकांची मुदत संपल्याने अनेक ठिकाणी प्रशासन राज सुरू करण्यात आलं आहे. नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषेदा आणि ग्रामपंचायतीच्या मुदत संपत आल्या आहे. त्यामुळे आगामी महिन्यात या सर्व निवडणुका लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ओबीसी आरक्षण आणि इतर विविध कारणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत, परंतु अलिकडेच निवडणुक आयोगाने या संदर्भात सर्वोच्य न्यायालयात माहिती दिली आहे.
अखेर 18 दिवसांनी गुणरत्ने सदावर्तेंची तुरूंगातून सुटका! म्हणाले, “मी मरायला देखील तयार आहे…;”
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. कारण याबाबत राज्य निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यावरून आता महापालिका निवडणुका 17 जून, नगरपालिका निवडणुका 22 जून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडुका 11 जूलै तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या 2 जुलैला होण्याची शक्यता आहे.
..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील विविध निवडणुकांचा वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. या प्रतिज्ञापत्रावरून येत्या 4 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी प्रतिवादी राज्य शासन आणि निवडणुक आयोग यांची मागणी मान्य करावी लागेल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा गुलाल उधळणार आहे.
नवनीत राणांचा ‘डी गॅंगशी’ आर्थिक व्यवहार! संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
दरम्यान, मागील काही महिन्यापासून राज्यातील निवडणुकांबाबत चर्चा सुरू होत्या. ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे या सर्व निवडणुका रखडल्या असल्याने यासंबंधी राजकीय नेत्यांनी आपपली भूमिका स्पष्ट केली होती. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही.तोपर्यंत राज्यातील निवडणुका होणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधी पक्षांनी देखील मांडली होती.
Read also:
- राज ठाकरे औरंगाबादमध्ये गरजणार! तर फडणवीसांची मुंबईत ‘बुस्टर डोस’ सभा; 1 मे रोजी राज्यात ‘राजकारण’ तापणार
- योगीचं कौतुक तर राज्य सरकारवर कडाडून टिका! राज ठाकरे, म्हणाले, “राज्यात योगी, नाहीतर सत्तेेचे भोगी”
- देशातील वातावरण बिघडण्याचे काम होत असेल तर..; शरद पवारांनी विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
- “मोदींनी मुळ विषय सोडून इतर विषयांवरच तारा छेडल्या”; राऊतांनी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून छेडले
- “आजकल गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु रोज टिव्हीवर..;” फडणवीसांचा शिवसेनेला टोला