जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटवरच्या अकाऊंटवरून शरद पवारांना धमकी दिली तर फोनवरून राऊतांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावरून आता फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावत अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांची काळजी घेतली जाईल, आवश्यकता असल्याच….”, धमकी प्रकरणानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार उत्तुंग व्यक्तिमत्व असून अशा धमकी देणाऱ्या गिधडांना घाबरणार नाही. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. विरोधी पक्षाचं नेतृत्व करणारे शरद पवार यांना बदनाम केल्याचा कट रचला जात आहे. आज कायदा सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही. कुणीही येतं कुणीही बडबड करतं. यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. तसेच फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी टिका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
हेही वाचा…राज्यात धमकीचे प्रकरण….! मुख्यमंत्री देवदर्शनाला जम्मूत, विरोधकांची जोरदार टिका
दरम्यान, अलिकडेच शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरचा नामोउल्लेख औरंगाबाद केल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. याच संदर्भात मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय नेते शरद पवारांवर निशाणा साधत आहेत. यातच आता सौरभ पिंपळकर या ट्विवटर हॅंडलवरून ही धमकी आली आहे. तुमचा देखील दाभोळकर होणार, असं म्हणत शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. तसेच राजकारण महाराष्ट्राचं या ट्विटर हॅंडलवरून धमकी देण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हे रक्त नेमकं कुणाचं आहे. ? राष्ट्रवादीचा सवाल, “शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता बावनकुळेंच्या बाजूला
हेही वाचा…मोठी बातमी…! राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २ व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
हेही वाचा…“..तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, चित्रा वाघ-आव्हाडांमध्ये जुंपली
हेही वाचा…“तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला?” राष्ट्रवादीने राणेंना डिवचलं
हेही वाचा…“राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?