मुंबई : राज्यात ठिकठिकाणी दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडत आहेत. अनेक ठिकाणी राजकीय नेते अशा कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील जांभोरी मैदानानंतर मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी गोंविद पथकांना संबोधले. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टिप्पणी केली आहे.
“देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
राज्यात आता आपलं सरकार आलं आहे. पाऊस सुरू होतोय आणि बघा आपलं सरकार आलं तर काय होतं? आपलं सरकार आलं तर दहीहंडी जोरदार, गणेशोत्सव जोरदार, नवरात्री जोरात आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, आता तुम्हा फक्त गोविंदा नाहीत. तुम्ही खेळाडू आहात. आता तुम्हाला खेळाडूचे सर्व लाभ दिले जाणार आहेत. याठिकाणी कुणी जखमी होऊ नये. जर झाला तर सरकार आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थितींना केला.
“शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
दहीहंडीमधील निघाणारं लोणी सगळ्या लोकांपर्यंत पोहचणार आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यावर अमोल मिटकरी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जी दहीहंडी कार्यक्रमात बोलले की, “आम्ही मलाई गोरगरीबां पर्यंत पोहचवु”. परंतु कदाचित ते सुरत व गुवाहाटीमध्ये बसुन गलेलठ्ठ मलाई खाऊन टुम झालेल्या 40 गरीब गोविंदांना ठाण्यातुन आणलेल्या मलाईबाबत बोलले असावेत असं म्हणत त्यांनी त्यांना खोचक टोला लगावला.
“राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यात दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली. एका कार्यक्रमात त्यांनी दीड महिन्यापूर्वी आम्ही देखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खुप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही 50 थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं काहीही कारण नाही असंही ते म्हणाले.
Read also
- भाजप हिंदू सणाबरोबर आहे, अन् शिवसेना हिंदू सण विसरली; आशिष शेलारांचा सेनेवर निशाणा
- “आम्ही देखील 50 थरांची हंडी फोडली”; एकनाथ शिंदेंची दहीहंडी कार्यक्रमात टोलेबाजी
- “वरळी जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचे आयोजन”; शिवसेनेची पोस्टरबाजी
- “मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
- “मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी