मुंबई : देशात आज मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. राज्यात अनेक ठिकणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा उत्सव निर्बंधमुक्त असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. भाजपने वरळी जांबोरी मैदानावर दहीहंडीचे आयोजन केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं आहे, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपुर्ण मुंबईत 372 ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं आहे. शिवसेनेने मराठी माणसाचे सण कधीच मागे सोडले आहेत. गणपती, नवरात्री, दहीहंडी, श्रावण यातील सहभागता केव्हाच सोडली आहे. म्हणुनच परळी जांबोरी मैदानाला शिवसेनेने साधा अर्ज देखील टाकला नाही. भाजप हिंदु सणाबरेबर आहे आणि शिवसेना हिंदु सण विसरली आहे, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला.
“राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
जो बीत से गई वो होत से नही आती है, असं म्हणत, वरळीच नाही तर संपुर्ण मुंबईत भाजपचं कमळ खिलणार आहे. वरळईचा आमदार देखील भाजपच्या मतांवर निवडून आलेला आहे. त्यामुळे शिवसेनेने आम्हाला शहाणपण शिकवू नये, असंही आशिष शेलार म्हणाले.
“ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
वरळीच्या जांबेरी मैदानावर दहीहंडीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाजपकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. “वरळीकरांचा टाहो जांबोरी मैदान जिवंत राहू द्या” असा पोस्टर शिवसेनेकडून लावण्यात आला आहे. यामुळे आता भाजप विरूद्ध शिवसेना असं चित्र दिसत आहे.
Read also
- “आम्ही देखील 50 थरांची हंडी फोडली”; एकनाथ शिंदेंची दहीहंडी कार्यक्रमात टोलेबाजी
- “वरळी जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचे आयोजन”; शिवसेनेची पोस्टरबाजी
- “मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
- “मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी
- “देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र