मुंबई : मागील काही वर्षापासून दिशा सॅलियान प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच आता दिशा सॅलियान प्रकरणात एसआयटीमधून त्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विशेष पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. या तपासात काही अधिकारी प्रकरणातील माहिती राजकीय बॉसना देत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय.
हेही वाचा…“शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, परंतु केदारांची तातडीने रद्द झाली”, वडेट्टीवारांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सॅलियानचा संशयास्पद मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. त्यानंतर सहा दिवसानंतर लगेच १४ जून २०२० ला सुशांत सिंह राजपुतचा देखील मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. तर भाजपच्या नेत्यांनी मागणी केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी केली जात आहे. परंतु या प्रकरणात थातूरमातूर तपास करून बनावट क्लोजर रिपोर्ट सादर केला जात आहे. त्यामुळे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.
हेही वाचा..अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणारच, अजितदादांचं खुलं चॅलेंज, अमोल कोल्हेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, उच्च न्यायालयाने या प्रकरणात ठरवून दिलेल्या कायद्यानुसार मालवणी पोलीस स्टेशनचे आधीचे दोषी अधिकारी यांच्यावर आरोप असल्यामुळे त्या पोलीस स्टेशनच्या कोणत्याही अधिकारी केसचा तपास करू शकत नाही. त्यामुळे चिमाजी आढाव हे एसआयटीचे सदस्य राहू शकत नाही. चिमाजी आढाव हे अपात्र असूनसुद्धा एसआयटीमध्ये सदस्य असल्यामुळे एसआयटी ही बेकायदेशीर ठरली असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“केंद्राची कीड आता राज्यालाही लागली, भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय,” कुणी केली टिका?
हेही वाचा..बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकचा धोबीपछाड; भारतीय कुस्ती संघ बरखास्त!
हेही वाचा.कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
हेही वाचा…“तर लोकसभेच्या ४८ जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कुणाला किती जागा मिळणार? धक्कादायक माहिती समोर