पुणे : दोन प्रभाग पद्धतीची मागणी मी कधीच केली नव्हती. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले आहेत आणि हा निर्णय कायम राहणार आहे, असं सांगतानाच तीन प्रभागांचा फायदा नक्की कुणाला होतो ते पाहू, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
शेतातील पिके पाण्याखाली, शेतकरी वाऱ्यावर, पालकमंत्री मात्र पुणे दौऱ्यावर – पंकजा मुंडे
अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. तीनचा प्रभाग हे फायनल आहे. मी कधीच दोनचा प्रभाग मागितला नाही. तीन प्रभागांचा नेमका कोणाला फायदा होतो ते पाहू, असं अजितदादा म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा असं माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, अंत पाहू नका, पंचनामे नकोत, तात्काळ मदत द्या – राणा जगजितसिंह
पुण्यात तीन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 75 तास लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे. सीएसआरमधून 5 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत. पुणे शहरात एक लाख सिरींज घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातही सिरींज देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेत कोरोनाबाधितांचा रेट 2.1 टक्के आहे. मागच्यावेळीपेक्षा परिस्थिती सुधारली आहे. मृत्युदर 2.1 वर आला आहे. पिंपरीचा मृत्युदर थोडासा वाढला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेवर सोलापूरात गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण, वाचा सविस्तर…\
दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. ऐन वेळेवर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असं राजकीय पक्षांचं मत होतं. दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यानं सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असं झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभार रचना केली जाण्याची शक्यता असते.
शेतकऱ्यांना सर्वेतोपरी मदत करणार; पण सर्व माहिती मिळाल्यावरच, अरोदर नाही – अजित पवार
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. त्यातून प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं दिसत होतं. त्यामुळे अंतिम निर्णय होत नव्हता. पण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read Also :
- राष्ट्रवादीच्या तातडीच्या बैठकीत ओला दुष्काळ की आघाडीतली धूसफुस? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
- काँग्रेस पक्ष आजारी आहे, त्यांची सुज उतरली आहे परंतू, उपचार चुकीचे चालू आहेत – शिवसेना
- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान, पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा – फडणवीस
- महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली; ठाकरे पिता-पुत्र उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर
- प्रोटोकॉलप्रमाणे चिपी विमानतळाच उद्घाटन होणार; नारायण राणेंच नाव कितव्या क्रमांकावर?